Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आधीच महागाई अन् त्यात खाद्यतेलाचेही वाढले दर; सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार

चांगल्या पेरणीनंतरही कमी पावसामुळे यंदा देशात खाद्यतेलबियांचे नुकसान झाले. परिणामी, खाद्यतेल उत्पादनात 40 टक्क्यांची तूट निर्माण झाली आहे. या तुटीमुळे खाद्यतेल आयात दुप्पट होऊन आयातीच्या दरात आठ टक्क्यांची वाढ झाली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 19, 2023 | 12:47 PM
आधीच महागाई अन् त्यात खाद्यतेलाचेही वाढले दर; सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : चांगल्या पेरणीनंतरही कमी पावसामुळे यंदा देशात खाद्यतेलबियांचे नुकसान झाले. परिणामी, खाद्यतेल उत्पादनात 40 टक्क्यांची तूट निर्माण झाली आहे. या तुटीमुळे खाद्यतेल आयात दुप्पट होऊन आयातीच्या दरात आठ टक्क्यांची वाढ झाली आहे. जगातील सर्वाधिक खाद्यतेल वापरकर्ता देश असलेल्या भारतात एकूण मागणीच्या 40 ते 45 टक्केच खाद्यतेल तयार होते. उर्वरित खाद्यतेल आयात केले जाते. एकूण आयातीत जवळपास 65 टक्के पामतेलाचा समावेश असतो.

भारतात तयार होणाऱ्या 45 टक्के खाद्यतेलात जवळपास 25 टक्के सोयाबीन व त्यापाठोपाठ राइसब्रान (तांदळपासून) आणि भुईमुग यांचा समावेश असतो. या सर्व पार्श्वभूमीवर देशभरात यंदा खरिपातील तेलबिया पेरणी क्षेत्रात दहा वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत ०.६९ टक्क्यांची घट झाली असताना सर्वाधिक मागणी असलेल्या सोयाबीन पेरणीत दहा वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत 0.96 टक्के वाढ होती. मात्र खरिपात घेतल्या जाणाऱ्या भुईमुग, एरंडी, तीळ, जवस, सोयाबीन व सूर्यफुल या सहा प्रकारच्या तेलबियांचे उत्पादन मागीलवर्षीच्या 261.50 लाख टन उत्पादनाच्या तुलनेत यंदा फक्त 215.33 लाख टन उत्पादन होण्याची चिन्हे आहेत. या तुटीमुळेच देशात खाद्यतेल आयातीला जोर आला आहे.

खाद्यतेल आयात ११.६० लाख टन

अखिल भारतीय खाद्यतेल असोसिएशननुसार, नोव्हेंबर महिन्यात खाद्यतेल आयात 11.60 लाख टन इतकी झाली. त्यामध्ये ऑक्टोबरच्या तुलनेत 13 टक्क्यांची वाढ झाली. भारतात सर्वाधिक आयात ही पामोलिन तेलाची होती. यालाच व्हेजिटेबल ऑइल’ असेही संबोधले जाते. नोव्हेंबर महिन्यात अशा शुद्ध पामोलिन तेलाची आयात ऑक्टोबरच्या 53 हजार 497 टनाच्या तुलनेत तब्बल 1.71 लाख झाली. तर सोयाबीन तेलाची आयातही ऑक्टोबरच्या 1.35 लाख टनाच्या तुलनेत 1.49 लाख टनावर पोहोचली आहे. भारतात खाद्यतेल आयातीची मागणी वाढल्यानेच दरातदेखील वाढ झाली आहे.

असोसिएशननुसार, नोव्हेंबर महिन्यात भारतीय बंदरांवर शुद्ध पामोलिन तेलाचा दर ऑक्टोबरच्या 849 डॉलर प्रति टनावरुन 876 टनावर गेला. तर कच्चे पामोलिन तेल ऑक्टोबरच्या 867 डॉलरवरून 897 डॉलर प्रति टनावर पोहोचले आहे. त्याचवेळी कच्चे आयातीत सोयाबीन तेल भारतीत बंदरांवर 1068 डॉलर प्रति टन झाले आहे. हा दर ऑक्टोबर महिन्यात 986 डॉलर इतका होता. तर कच्च्या सूर्यफूल तेलाचा दर 920 डॉलर प्रति टनावरून 979 डॉलरवर गेला आहे.

Web Title: Edible oil in inflation edible oil import doubled production deficit 40 percent nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2023 | 12:45 PM

Topics:  

  • India news
  • maharashtra
  • Oil Prices

संबंधित बातम्या

“कोल्हापूर-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील भुयारी मार्गांची कामे वेगाने पूर्ण करा…”, शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचे निर्देश
1

“कोल्हापूर-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील भुयारी मार्गांची कामे वेगाने पूर्ण करा…”, शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचे निर्देश

रायगडच्या विकासाला निधीअभावी खीळ; MMRDA च्या रखडलेल्या कामांवरून माजी आमदार पंडित पाटील आक्रमक
2

रायगडच्या विकासाला निधीअभावी खीळ; MMRDA च्या रखडलेल्या कामांवरून माजी आमदार पंडित पाटील आक्रमक

Karjan water crisis : या गावात पाणीटंचाई! पावसाचे पाणी साठवून तहान भागवण्याची वेळ…
3

Karjan water crisis : या गावात पाणीटंचाई! पावसाचे पाणी साठवून तहान भागवण्याची वेळ…

महाराष्ट्रात सुरु होणार जगातलं पहिलं अ‍ॅडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग इंस्टीट्युट, देवेंद्र फडणवीसांची घोषणा
4

महाराष्ट्रात सुरु होणार जगातलं पहिलं अ‍ॅडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग इंस्टीट्युट, देवेंद्र फडणवीसांची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.