
‘महाराष्ट्र कृषी-कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण २०२५-२०२९’ धोरणांतर्गत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे ‘जागतिक कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आणि गुंतवणूकदार शिखर संमेलन’ (एआय फॉर अॅग्री २०२६) आयोजित करण्यात आले आहे. या परिषदेत कृषी क्षेत्रात जबाबदार एआयचा वापर या विषयावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. इन्फोसिस आणि आधार कार्डचे जनक सह-संस्थापक नंदन निलेकणी, मुख्य सचिव राजेश अग्रवाल आदी उपस्थित होते.
प्रशासकीय कामात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर
मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी प्रशासकीय कामात एआयचा वापर कसा होतो, यावर भर दिला. एआयमुळे शेतकऱ्याची शिष्यवृती किवा मदतीसाठीची पात्रता तपासणे सोपे झाले आहे. थेट बैंक खात्यात पैसे जमा करणे आता अधिक जलद होत आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत हवामान, मातीची स्थिती आणि पिकांच्या व्यवस्थापनाबद्दल अचूक माहिती घरबसल्या मिळू शकेल. माहिती अधिकार अंतर्गत उपलब्ध असलेला डेटा अधिक सुलभ करून स्टार्टअप्ससाठी नवीन संधी उपलब्ध करून देणे हा उद्देश असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्राचे कौतुक
नंदन निलेकणी यांनी महाराष्ट्राच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या भूमिकेचे कौतुक केले. एआयचा वापर करून शेती क्षेत्रात मोठे बदल घडवून आणले जात आहेत. ‘लार्ज लैंग्वेज मॉडेल्स’ (एलएलएम) मुळे शेतकऱ्यांना पडद्यामागची गुंतागुंत न समजता बेट आणि उपयुक्त उत्तरे मिळतात. इथिओपियाचे उदाहरण देत त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रात सुरू झालेल्या या तंत्रज्ञानामुळे दुग्ध सहकारी संस्थांसारखी मोठी कामे केवळ तीन आठवड्यांत पूर्ण करणे शक्य झाले आहे.
● ‘महा विस्तार सारख्या उपक्रमांमुळे महाराष्ट्र कृषी क्षेत्रात एआयचा वापर करणाऱ्या आघाडीच्या राज्यांपैकी एक म्हणून उदयास येत आहे. आधार आणि विविध डेटा प्लॅटफॉर्मसारख्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा (डिपीआय) या एआय स्वीकारासाठी भक्कम पाया ठरत आहे. लहान शेतकरी तसेच महिला शेतकऱ्यांना पाठबळ देणाऱ्या सर्वसमावेशक विकासावर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
– नंदन निलेकणी, इन्फोसिस