Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान; संकटातील बळीराजा कर्जमाफीच्या प्रतीक्षेत

शेतकऱ्यांना आता कर्जमाफीची तीव्र अपेक्षा आहे. कर्जमाफीशिवाय शेतकऱ्यांचा आर्थिक कणा पुन्हा उभा राहणे अशक्य आहे. सततच्या नैसर्गिक आपत्ती, वाढते उत्पादन खर्च आणि घटणारे बाजारभाव या तिहेरी संकटात शेतकरी सापडला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 05, 2025 | 12:22 PM
शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान; संकटातील बळीराजा कर्जमाफीच्या प्रतीक्षेत

शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान; संकटातील बळीराजा कर्जमाफीच्या प्रतीक्षेत

Follow Us
Close
Follow Us:

कोल्हापूर/दीपक घाटगे : गेल्या चार वर्षांपासून महाराष्ट्रातील शेतकरी प्रचंड संकटात सापडला आहे. एकीकडे कोरोना महामारीचा तडाखा, तर दुसरीकडे अतिवृष्टी, महापूर आणि अस्थिर हवामानामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. या काळात शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी घट झाली असून, अनेकांचे पिके अक्षरशः वाहून गेली आहेत. गेल्या वर्षभरातही सततच्या पावसामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडून पडला आहे. परिणामी, आता त्यांना कर्जमाफीची तीव्र अपेक्षा आहे. कर्जमाफीशिवाय शेतकऱ्यांचा आर्थिक कणा पुन्हा उभा राहणे अशक्य आहे. सततच्या नैसर्गिक आपत्ती, वाढते उत्पादन खर्च आणि घटणारे बाजारभाव या तिहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. त्यामुळे सरकारने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे गरजेचे असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.

साखर कारखानदार, आमदार, खासदार आणि मंत्री यांनीही या प्रश्नावर ठामपणे आवाज उठविण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांचे हितसंबंध केवळ आंदोलनांतून नव्हे, तर विधानभवनापर्यंत पोहोचवणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. गेल्या दोन वर्षांतील अतिवृष्टीमुळे राज्यातील निम्म्यापेक्षा जास्त उत्पादन घटले आहे. शेतीतील उत्पन्न कमी झाल्याने कर्जफेड करणे कठीण झाले आहे. काँग्रेस सरकारच्या काळात कर्जमाफी झाली होती, मात्र ती अनेक प्रकरणांत धनदांडग्यांना आणि कर्जबुडव्यांना मिळाल्याचा आरोप झाला. त्यानंतर प्रामाणिक कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तरीसुद्धा आजही हजारो शेतकरी कर्जबाजारी आहेत.

शासनाने ठोस निर्णय घेण्याची गरज

सध्या शेतकरी ‘अस्मानी व सुलतानी संकटात’ सापडला आहे. वाढत्या व्याजदरामुळे कर्जाचा बोजा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शेतकरी संघटनांनी पुन्हा एकदा सरसकट कर्जमाफीची मागणी केली आहे. शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, त्यांचा आत्मसन्मान टिकावा आणि आत्महत्यांचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी राज्य शासनाने ठोस निर्णय घेण्याची गरज आहे.

आश्वासन कधी पूर्ण करणार?

यापूर्वी युपीए सरकारच्या काळात तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंह यांनी सुमारे ७० हजार कोटी रुपयांची ऐतिहासिक कर्जमाफी जाहीर केली होती. महाविकास आघाडी सरकारनेही कोणत्याही अटीशिवाय सरसकट कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला होता. मात्र सध्याच्या महायुती सरकारकडून निवडणुकीदरम्यान दिलेले कर्जमाफीचे आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही. सत्तेवर आल्यानंतर हे आश्वासन धुळीस मिळाले असून, कर्जमाफीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

फेडण्याची ताकद उरली नाही

शेतकरी आणि त्यांचे कुटुंबीय आता सरकारकडे आशेने पाहत आहेत. शेतकऱ्यांचे म्हणणे स्पष्ट आहे की, आम्ही कर्जमाफी मागतो कारण आमच्याकडे फेडण्याची ताकद उरलेली नाही. देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत असल्याची वस्तुस्थिती अत्यंत वेदनादायी आणि लाजीरवाणी आहे. त्यामुळे सरकारने तातडीने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून त्यांच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या संकटातून मुक्तता करावी, अशी मागणी शेतकरी संघटना, तज्ज्ञ आणि ग्रामस्थांकडून होत आहे.

Web Title: Farmers are expressing their desire for loan waiver due to crop damage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2025 | 12:22 PM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • CM Devedra Fadnavis
  • Eknath Shinde
  • Farmers

संबंधित बातम्या

टाकळीवाडीच्या माळावर भेसळ खव्याचे केंद्र, नागरिकांच्या आरोग्याला धोका; अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह
1

टाकळीवाडीच्या माळावर भेसळ खव्याचे केंद्र, नागरिकांच्या आरोग्याला धोका; अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह

‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्मचा लोकार्पण सोहळा संपन्न
2

‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्मचा लोकार्पण सोहळा संपन्न

पुणे-नाशिक महामार्गावरील पेट्रोल पंपावर दरोडा; चोरट्यांनी हवेत गोळीबार केला अन्…
3

पुणे-नाशिक महामार्गावरील पेट्रोल पंपावर दरोडा; चोरट्यांनी हवेत गोळीबार केला अन्…

पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी संकटात; शरद पवारांनी सरकारकडे केली ‘ही’ मोठी मागणी
4

पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी संकटात; शरद पवारांनी सरकारकडे केली ‘ही’ मोठी मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.