Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसामुळे शेतकरी सुखावला, पिकांना मिळाले जीवदान; विहिरींची पाणी पातळी वाढण्याची शक्यता

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील रांजणी परिसरात गेले दोन दिवस पडलेल्या पावसामुळे शेतकरी सुखावला आहे. झालेला पाऊस हा शेतपिकांना खऱ्या अर्थाने जीवदान देणारा ठरला आहे तर विहिरींच्या पाण्याची पातळी देखील वाढण्याची शक्यता आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 10, 2023 | 02:03 PM
पावसामुळे शेतकरी सुखावला, पिकांना मिळाले जीवदान; विहिरींची पाणी पातळी वाढण्याची शक्यता
Follow Us
Close
Follow Us:

आंबेगाव : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील रांजणी परिसरात गेले दोन दिवस पडलेल्या पावसामुळे शेतकरी सुखावला आहे. झालेला पाऊस हा शेतपिकांना खऱ्या अर्थाने जीवदान देणारा ठरला आहे तर विहिरींच्या पाण्याची पातळी देखील वाढण्याची शक्यता आहे.

तालुक्याच्या पूर्व भागातील रांजणी, वळती, नागापूर, शिंगवे, भागडी, गांजवेवाडी, जाधववाडी, थोरांदळे, भराडी, चांडोली बुद्रुक आदी गावांना गेले दोन दिवस पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे सोयाबीन आणि इतर शेतपिकांना जीवदान मिळाले आहे.

दरम्यान मागील एक महिन्यापासून पाऊस न झाल्याने हलक्या प्रतीच्या जमिनीतील सोयाबीन पीक आणि इतर पिके सुकून गेली होती. मध्यम कसदार जमिनीतील सोयाबीनसह खरीप पिके तग धरून होती. मात्र पाण्याचा ताण असल्याने सोयाबीनच्या फुलांची गळ व्हायला सुरुवात झाली होती. शेंगा निर्मितीवर परिणाम झाला त्यामुळे उत्पन्नातील घट निश्चित आहे. झालेल्या पावसामुळे खरीप पिकांना काही प्रमाणात लाभ होणार असून हिरवा चारा उपलब्ध होण्यासाठी मदत होणार आहे. विहिरींची खालावलेली पाणी पातळी देखील झालेल्या पावसामुळे वाढणार आहे.

गेले दोन दिवस पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचा उत्साह वाढला असून, ऊस लागवडी करण्यास सुरुवात झाली आहे. पावसाअभावी बहुतांशी शेतकऱ्यांनी नविन उसाची लागवड थांबवली होती. मात्र पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या अशा पल्लवीत झाल्या आणि शेतकऱ्यांनी पुन्हा ऊस लागवडीकडे लक्ष केंद्रित आहे. मात्र यंदा मुळातच पाऊस कमी पडल्यामुळे ऊस लागवड क्षेत्रामध्ये घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तालुक्यात पूर्व भागाप्रमाणे पश्चिम पट्ट्यात देखील संततधार पाऊस पडल्याने तालुक्याला वरदान ठरलेले डिंभे धरण पूर्ण क्षमतेने पाण्याने भरले आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. पश्चिम पट्ट्यातील भात पिकांना जीवदान मिळाले असून, भात पिके तरारली असल्याची चित्र पाहायला मिळते.

गेले दोन दिवस तालुक्यात सर्वत्र चांगला आणि समाधानकारक पाऊस पडल्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे. एकूणच कुकडी प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या डिंभे, माणिकडोह, येडगाव, वडज आणि पिंपळगांव जोगे या पाच धरणांपैकी डिंभे आणि वडज ही धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत तर येडगाव आणि पिंपळगावजोगे तसेच माणिकडोह धरण पाण्याने पुर्ण क्षमतेने भरण्यासाठी अद्यापही पावसाची आवश्यकता आहे.

गेले दोन दिवसापासून तालुक्याच्या पूर्व भागात पडलेला पाऊस शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने जीवनदायी ठरला आहे. शेतकऱ्यांची खरीपातील पिके कशीबशी येण्याची शक्यता आहे. भविष्यात पाण्याची टंचाई दूर होईल आणि उन्हाळ्यात शेतीबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटेल, असं जाधववाडी येथील शेतकरी म्हणाले.

Web Title: Farmers were happy due to rain crops got life possibility of increase in water level of wells nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2023 | 02:03 PM

Topics:  

  • Ambegaon
  • cmomaharashtra
  • maharashtra
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
1

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
2

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
3

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…
4

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.