अनेक ठिकाणी रद्द करण्यात आलेला टोरंट जलविद्युत प्रकल्प कर्जत तालुक्याच्या मानगुटीवर बसवण्यात आला आहे.या प्रकल्पाला सर्वबाजूंनी विरोध केला जात असून स्थानिक पाली तर्फे कोतवाल खलाटी ही ग्रामपंचायत पूर्णपणे धरणाच्या विरोधात आहे.मात्र तरीदेखील शासनाच्या हस्तक्षेप आणि शासनाचा छुपा पाठिंबा यामुळे टोरंट कंपनील बळ मिळाले आहे.कंपनीला वन विभागाने 640 एकर जमीन दिली असल्याचे स्थानिक पातळीवर बोलले जात आहे.त्यानंतर त्या जमिनी मधील जुनी झाडे नष्ट करण्याचे कारस्थान टोरंट कंपनी कडून सुरू आहे.
झाडे नष्ट करण्यासाठी आग लावण्यात आल्याची अनेक घटना घडल्या आहेत.त्यात आता 100 ते 200 वयोमान असलेली जुनी झाडे तोडण्याचे काम सुरू झाले आहे. ही झाडे स्थानिकांच्या डोळ्यासमोर तोडली जात असून वन विभागाच्या क्षेत्रातील ही झाडे तोडली जात असताना वन विभागाचा एकही कर्मचारी त्या ठिकाणी जाऊन आक्षेप घेत नसल्याने स्थानिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत.स्थानिकांनी दळी जमिनीमधील झाडे तोडली तरी आवाज उठवणारे वन विभाग आता आहे कुठे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
मात्र वन जमिनीमध्ये असलेली जुनी झाडे तोडण्यास स्थानिक कार्यकर्ते आणि पर्यावरणप्रेमी पप्पू देशमुख यांनी विरोध केला आहे. देशमुख हे दिवसभर जंगलात फिरून जंगलात कुठेही झाडे तोडली जात असल्यास तेथे पोहचतात आणि आक्षेप घेतात.स्थानिक आदिवासी लोक हे देशमुख यांच्या सोबत जंगलात जाऊन हा आक्षेप नोंदवत असल्याने टोरंट कंपनीचे झाडे तोडण्याचे पितळ उघडे पडले आहे.देशमुख यांच्याकडून जंगलात जाऊन घेण्यात येत असलेल्या आक्षेप यामुळे पावसाआधी जंगल समूळ नष्ट करण्याचे टोरंट कंपनीचे प्रयत्न काही प्रमाणात फोल ठरत आहेत. त्यामुळे पर्यावरण प्रेमी पप्पू देशमुख हे टोरंट कंपनी साठी जंगल तोडीपासून वाचवण्यात अडथळा ठरले आहेत.त्यामुळे यावर्षी काही दिवसावर आलेल्या पावसाळा लक्षात घेता हजारो झाडे नष्ट होण्यापासून वाचली आहेत.
करवतीचे घाव कशासाठी..
टोरंट कंपनीकडून जंगल साफ करण्यासाठी अनेक झाडांना करवतीचे घाव घातले जात आहे.बहुसंख्य झाडांच्या मुळाशी असे घाव घातल्याचे चित्र साई डोंगर मध्ये पाहायला मिळत आहे.






