File Photo : Sambhaji Raje
कोल्हापूर : विशाळगड पायथ्याला झालेल्या हिंसक घटनेनंतर कोल्हापूर पोलिसांनी शिवभक्तांची धरपकड सुरू केली आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे संभाजीराजेंवर अटकेची टांगती तलवार आहे. दरम्यान, मी सर्व शिवभक्तांच्या पाठीशी ठामपणे उभा असून मी स्वतः शाहूवाडी पोलिस स्टेशन येथे हजर होण्यास जात आहे. सर्वांनी संयम बाळगावा व कायद्याचा सन्मान राखावा, असे आवाहन केले आहे.
संभाजीराजे यांनी आज गुन्हा दाखल झाल्यानंतर पत्रकार परिषद घेत प्रशासनावर जोरदार टीका केली. संभाजीराजे यांनी सांगितले की, काल विशाळगड येथे झालेल्या प्रकरणानंतर पोलिसांनी शिवभक्तांची धरपकड सुरू केलेली आहे. काही शिवभक्तांवर गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत. प्रशासन स्वतःच्या चुकीवर पडदा टाकण्यासाठी व स्वतःचा बेजबाबदारपणा लपविण्यासाठी जाणीवपूर्वक शिवभक्तांना लक्ष्य करत आहे. मी सर्व शिवभक्तांच्या पाठीशी ठामपणे उभा असून मी स्वतः शाहूवाडी पोलिस स्टेशन येथे हजर होण्यास जात आहे. सर्वांनी संयम बाळगावा व कायद्याचा सन्मान राखावा.
काल विशाळगड येथे झालेल्या प्रकरणानंतर पोलिसांनी शिवभक्तांची धरपकड सुरू केलेली आहे. काल शिवभक्तांचा आक्रोश पाहून विशाळगडावर अतिक्रमण काढू असे तुम्ही सांगितले. आतापर्यंत का अतिक्रमण काढले नाही. न्यायालयीन बाब आहे असे सांगितले होते लगेच परवानगी कशी दिली हा माझा त्यांना सवाल आहे. संसद भवनमध्ये छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी करण्याचा पायंडा मी पाडला आहे.
यासिन भटकरचे विशाळगडावर वास्तव्य
आतापर्यंत या ठिकाणी कधीही जयंती साजरी केली जात नव्हती, असे ते म्हणाले. यासिन भटकर हा अतिरेकी आहे. त्याचे या विशाळगड परिसरात वास्तव्य होते. याच्या पाठीमागे कोणाचा हात आहे. सरकारने अगोदर विचार करावा म्हणजे अशा लोकांना तुम्ही पाठीशी घालता हे कसले तुमचे सरकार आहे. या ठिकाणचे स्थानिक नेते पालकमंत्री मला पुरोगामीचे विचार शिकवतात. छत्रपती घराण्यातच पुरोगामी विचाराचे बीजे रूजली आहेत तुम्ही सांगायची मला गरज नाही, असेही ते म्हणाले.