Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल बैस यांची भेट; केली ‘ही’ मागणी

महाराष्ट्र भूषण (Maharashtra Bhushan) कार्यक्रमाची उच्चस्तरीय चौकशी करुन सदोष मनुष्यधाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या (Thackeray Group Meet Governor) शिष्टमंडळाने आज राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) यांची राजभवन येथे भेट घेत राज्यपालांना राज्याचे प्रमुख या नात्याने लक्ष घालण्याची मागणी केली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 24, 2023 | 04:33 PM
ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल बैस यांची भेट; केली ‘ही’ मागणी
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : महाराष्ट्र भूषण (Maharashtra Bhushan) कार्यक्रमाची उच्चस्तरीय चौकशी करुन सदोष मनुष्यधाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या (Thackeray Group Meet Governor) शिष्टमंडळाने आज राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) यांची राजभवन येथे भेट घेत राज्यपालांना राज्याचे प्रमुख या नात्याने लक्ष घालण्याची मागणी केली.

खारघर येथील घटना ही मानवनिर्मित आपत्ती असल्याने राज्य सरकार सत्य परिस्थिती दडविण्याचा प्रयत्न करत आहे. ही घटना महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करणारी आहे. त्यामुळे सदर घटनेची सत्य परिस्थिती जनतेसमोर येणे आवश्यक आहे. तसेच, भविष्यात अशा प्रकारची घटना घडू नये यासाठी सदर प्रकरणी आपण उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित दोषींविरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यास शासनास निर्देश द्यावेत, अशा मागणीचे निवेदन शिष्टमंडळाने राज्यपाल यांना दिले.

खारघर येथे ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्याचा कार्यक्रमात उष्माघात व चेंगराचेंगरीमुळे 14 श्रीसेवकांचा नाहक जीव गेला. मात्र, सरकारने या दुर्दैवी घटनेनंतर कोणतीही भूमिका अथवा प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. सरकारने जारी केलेल्या आकड्यांबाबत आजही संभ्रम कायम आहे. अद्याप स्थानिक पोलीस ठाण्यात या घटनेबाबत मृत्यूची नोंद झाली नाही.

महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाला 14 कोटी रुपये खर्च करण्यात आला. मात्र, कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही. सदर घटनेला जबाबदार ठरलेल्या व नियोजनात निष्काळजीपणा करणाऱ्या स्थानिक वरिष्ठ पोलीसांवरही किमान कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी देखील राज्यपालांकडे केल्याची माहिती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली. तसेच सदर घटनेबाबत आजच सरकारशी बोलून पावलं उचलण्याच अभिवचन राज्यपाल यांनी दिल्याचे अंबादास दानवे यांनी सांगितले.

Web Title: Fir should register for maharashtra bhushan case and inquiry for same thackeray group demanded to governor nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2023 | 04:33 PM

Topics:  

  • maharashtra bhushan
  • political news
  • ramesh bais
  • Thackeray Group

संबंधित बातम्या

Pitya Bhai in BJP: राज ठाकरेंची टीका लागली जिव्हारी! संघावरुन कान टोचताच पिट्या भाईचा भाजप प्रवेश
1

Pitya Bhai in BJP: राज ठाकरेंची टीका लागली जिव्हारी! संघावरुन कान टोचताच पिट्या भाईचा भाजप प्रवेश

Mhaswad Municipality Elections : नगराध्यक्षपदासाठी आता पाच महिला रिंगणात; निवडणुकीत येणार रंगत
2

Mhaswad Municipality Elections : नगराध्यक्षपदासाठी आता पाच महिला रिंगणात; निवडणुकीत येणार रंगत

‘कराड आणि मलकापूरमध्ये भाजपचाच नगराध्यक्ष असेल’; आमदार अतुल भोसलेंचा विश्वास
3

‘कराड आणि मलकापूरमध्ये भाजपचाच नगराध्यक्ष असेल’; आमदार अतुल भोसलेंचा विश्वास

भाजप शहर निवडणुकीची कमान आता आमदार अमित गोरखे यांच्या हाती; निर्णयाचं होतंय स्वागत
4

भाजप शहर निवडणुकीची कमान आता आमदार अमित गोरखे यांच्या हाती; निर्णयाचं होतंय स्वागत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.