• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Freedom Of Expression Must Be Protected Damodar Mavjo Nrdm

अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपले पाहिजे : दामोदर मावजो

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोंकणी साहित्यिक दामोदर मावजो म्हणाले, तीन महिन्यात संमेलनाचे आव्हान पेलणे, कौतुकास्पद आहे. मी गोव्यातून आलोय. उदगीरबद्दल माहीत नव्हते. काहींनी येथे उन्हाळा कडक असल्याचे सांगितले. 

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 22, 2022 | 06:03 PM
अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपले पाहिजे : दामोदर मावजो
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

उदगीर : ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोंकणी साहित्यिक दामोदर मावजो म्हणाले, तीन महिन्यात संमेलनाचे आव्हान पेलणे, कौतुकास्पद आहे. मी गोव्यातून आलोय. उदगीरबद्दल माहीत नव्हते. काहींनी येथे उन्हाळा कडक असल्याचे सांगितले.

मात्र येथील प्रेमाने उन्हाळा जाणवलाच नाही. कोकणी-मराठी नाते 600- 700 वर्षांचे आहे. संत नामदेव यांनी पंजाबी, उर्दू, कोकणी, मराठी, गुजराती अशा सर्व भाषात रचना केल्या. तेच कोकणी भाषेचे पहिले कवी असून, 14 व्या शतकात त्यांनी कोकणीत गौळण प्रकारात रचना केल्या आहेत. इतर भाषांतील शब्द संपदा स्वीकारल्यानेच मराठी समृद्ध झाली आहे. आज मराठी सर्वाधिक संपन्न भाषा असून, इतर बोलींचा आनंद घेतला पाहिजे.

चिरंतनाला धक्के देणारे साहित्य कालानुरूप असते. आवडत नसलेले साहित्य जाळणे, बंदी घालणे योग्य नव्हे. सत्तेला माज चढतो, तेव्हा साहित्यावर निर्बंध लादले जातात. मात्र, अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपले पाहिजे. इंदिरा गांधी यांच्या काळात आणीबाणीला साहित्यिकांनी प्रखर विरोध केला. आज साहित्यात सत्ताधाऱ्यांना चिअर्स करणारे चिअर्स लिडर्स तयार झाले आहेत, हे दुर्दैव आहे. किंबहुना, लेखक हा असा असू नये. तो बंडखोरच असला पाहिजे, असे ते म्हणाले.

मला वाद नव्हे; संवाद आवडतो. मी कोकणी भाषक. कोकणीत लिहितो. मराठी लेखक आणि आपल्यात कधीच भाषावाद आला नाही. कोकणी व मराठीत द्वेष नको, वाद नको. पुढचे संमेलन गोव्यात घ्या. सर्व सहकार्य करू. सर्व वाद हे संवादातूनच मिटतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज : अशोक चव्हाण

सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. अशोक चव्हाण म्हणाले, “भाषा-भाषांमध्ये एकोप्याचे वातावरण निर्माण करून मराठी भाषा अधिक-अधिक समृद्ध केली पाहिजे. मराठवाडा ही संतांची आणि चळवळीची भूमी आहे. ते अनेक भाषांचे आगर आहे. मराठवाड्यात तेलगु, उर्दू, कन्नड, मराठी भाषा बोलल्या जात असल्यातरी येथे मराठी भाषेचा दबदबा आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून पुस्तकांचे गाव उपक्रम राबविला पाहिजे.”

डीजीटल स्वरुपात साहित्य निर्माण व्हावे : शिवराज पाटील चाकूरकर

माजी केंद्रीय गृहमंत्री श्री. शिवराज पाटील चाकूरकर म्हणाले, “साहित्य हे व्यावहारिक, आध्यात्मिक आणि वैज्ञानिक अशा विविध पद्धतीचे असू शकते. इतर भाषेतील ग्रंथ मराठीत यावेत. कुराण, बायबल, उपनिषदे यासारखी अजरामर साहित्य निर्माण व्हावीत. येणारा काळ हा डीजीटल आहे. त्याचा मोठया प्रमाणावर वापर होणार आहे. यासाठी डीजीटल स्वरुपात साहित्य निर्माण व्हावे.”

[read_also content=”म्हाडाचे घर मिळवून देण्याचे अमिष दाखवून लाखो रुपये उकळले https://www.navarashtra.com/maharashtra/millions-of-rupees-were-boiled-by-showing-greed-to-get-mhadas-house-nrdm-272104.html”]

उदगीर जिल्हा व्हावा : बसवराज पाटील नागराळकर

संस्थेचे अध्यक्ष श्री बसवराज पाटील नागराळकर प्रास्ताविक करताना म्हणाले की, संस्थेचा हीरक महोत्सव साजरा होतो आहे आणि महामंडळाने संमेलन आयोजनाची जबाबदारी दिली आहे. उदगीर हा सीमा भाग आहे. मराठी, तेलगू, कानडी, हिंदी उर्दू भाषा बोलल्या जातात. या तालुक्याला इतिहास आहे. येथे भुईकोट किल्ला आहे. ही संस्था नावाजलेली आहे. संमेलनात सर्व विषयांचा समावेश करण्यात आला आहे. येथे बालकुमार आणि पर्यावरण यावर चर्चा होणार आहे. या परिसरात 300 स्टॉल आणि 7 भव्य मंडप उभारण्यात आले आहेत. ग्राम पंचायतीच्या ठिकाणी संमेलन होत आहे, असे प्रथमच होत आहे. उदगीर हा जिल्हा व्हावा अशी आमची अनेक वर्षाची मागणी आहे. या संमेलनाच्या निमित्ताने मागणी मांडत आहोत असे ते म्हणाले.

Web Title: Freedom of expression must be protected damodar mavjo nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2022 | 06:02 PM

Topics:  

  • ashok chavhan

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Konkan Ganesh Festival: चाकरमान्यांसाठी दिलासदायक! गणेशोत्सवादरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी

Konkan Ganesh Festival: चाकरमान्यांसाठी दिलासदायक! गणेशोत्सवादरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी

गायनाची कला दाखवल्याने सस्पेंड तहसीलदार; सरकारी कार्यपद्धतीने केला प्रहार

गायनाची कला दाखवल्याने सस्पेंड तहसीलदार; सरकारी कार्यपद्धतीने केला प्रहार

Travel Hacks: परफेक्ट होमस्टे बुक करताना फक्त पाळा ‘या’ 8 टिप्स, नक्कीच ठरतील फायदेशीर

Travel Hacks: परफेक्ट होमस्टे बुक करताना फक्त पाळा ‘या’ 8 टिप्स, नक्कीच ठरतील फायदेशीर

मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘या’ देशाच्या सरकाराचा मोठा निर्णय; १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंद

मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘या’ देशाच्या सरकाराचा मोठा निर्णय; १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंद

Pune News: नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर RTO ची धडक कारवाई; ६७ लाखांचा दंड वसूल, तर ६०८ बस

Pune News: नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर RTO ची धडक कारवाई; ६७ लाखांचा दंड वसूल, तर ६०८ बस

Fact Check : निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी जनतेकडून पैसा गोळा करतंय सरकार? परराष्ट्र मंत्रालयाने दिला धोक्याचा इशारा

Fact Check : निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी जनतेकडून पैसा गोळा करतंय सरकार? परराष्ट्र मंत्रालयाने दिला धोक्याचा इशारा

India travel trends 2025 : भारतीय पर्यटकांनी तुर्की-अझरबैजानकडे पाठ फिरवून मालदीवलाही दाखवली ‘जागा’; ‘हे’ देश ठरले नवी पसंती

India travel trends 2025 : भारतीय पर्यटकांनी तुर्की-अझरबैजानकडे पाठ फिरवून मालदीवलाही दाखवली ‘जागा’; ‘हे’ देश ठरले नवी पसंती

व्हिडिओ

पुढे बघा
Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.