
महाबळेश्वरमध्ये पावसाचा धुमाकूळ; वेण्णा तलाव ओव्हरफ्लो, आंबेनळी घाटात दरडी तर पर्यटकांची तुफान गर्दी
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी कामगार सेना गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करत होती. नामदार जयकुमार गोरे यांनी या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून सकारात्मक निर्णय घेतल्याने कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेचे राज्य अध्यक्ष विलास कुमारवार, राज्य उपाध्यक्ष राजन लिगाडे, राज्य पदाधिकारी जनार्दन मुळे आणि दयानंद एरंडे यांनी मंत्री गोरे यांचे आभार मानले आहेत.
सातारा जिल्हाध्यक्ष जे. के. काळे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत करत नामदार जयकुमार गोरे यांचे प्रत्यक्ष बंगल्यावर जाऊन सत्कार केला. याप्रसंगी सातारा जिल्हा खजिनदार गणपतराव फडतरे, अमोल काळोखे, प्रशांत साळुंखे, रामदास वाघचौडे, हनुमंतराव डोईफोडे, चतूर . रामचंद्र चिंचकर, नवनाथ आवळे यांच्यासह संघटनेचे इतर पदाधिकारी आणि ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या कामाला आता अधिक गती आणि न्याय मिळेल, असा विश्वास यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
Satara News: गोडोलीच्या वाहतूक कोंडीला ‘ब्रेक’; पोवई नाका ते साईबाबा मंदिर परिसर होणार मोकळा