Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“… अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहे”; Ethanol बाबत हर्षवर्धन पाटलांची मोठी मागणी

देशाचे साखर आणि जैव ऊर्जा क्षेत्र सध्या अत्यंत कठीण परिस्थितीतुन जात आहे. यात हस्तक्षप, सुधारणा आणि धोरणात्मक निर्णय ताबडतोबीने न झाल्यास त्याचे अत्यंत विपरीत आणि दुरगामी परिणाम होण्याची भीती आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 17, 2026 | 08:32 PM
“… अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहे”; Ethanol बाबत हर्षवर्धन पाटलांची मोठी मागणी
Follow Us
Close
Follow Us:

उसाचा हंगाम १५ मार्चपर्यंत संपण्याचा अंदाज
इथेनॉलचा कोटा ६० कोटीने वाढवण्याची मागणी
इथेनॉल योजनेची मुहुर्तमेढ ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी

पुणे: महाराष्ट्रातील कारखान्यांनी दैनंदिन गाळप क्षमतेत केलेली मोठी वाढ आणि ऊस तोडीत केन हार्वेस्टरचा वाढलेला वापर यामुळे यंदाचा हंगाम फेब्रुवारी अखेर किंवा जास्तीत जास्त १५ मार्चपर्यंत संपण्याची चिन्हे आहेत. साखर कारखान्याकडे मळी पडून असून, केंद्रसरकारकडे इथेनॉलचा कोट्याची म्हणजे ६० कोटी ने वाढवून द्यावा ही प्रमुख मागीणी आम्ही केली आहे जी मळी पडून आहे तीची प्रक्रिया होईल. त्यातून मार्ग निघेल अशी माहीती पत्रकार परिषदे मध्ये राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्याक्ष हर्षवर्धन पाटील  यांनी दिली.

हर्षवर्धन पाटील म्हणाले, वास्तविक पाहता इथेनॉल योजनेची मुहुर्तमेढ देशभरातील ५ कोटी अल्प भूधारक ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी करण्यात आली आहे. सुरुवातीपासून एकूण इथेनॉल पुरवठ्यामध्ये साखर उद्योगाचा असलेला ९० टक्के वाटा आजच्या घडीला २८ टक्केच उरला आहे. कारण तेल कंपन्यांनी इथेनॉल पुरवठ्याचे आवंटन (अलोकेशन) धान्य इथेनॉलला प्राधान्यतेने (७२ टक्के) करण्याचे अवलंबले आहे.

त्यामुळे इथेनॉल निर्मितीची ६०० कोटी लिटर्सची क्षमता आज पडून आहे आणि त्यात झालेली गुंतवणुक व त्यावरील व्याजाच्या बोज्यासाठी साखर उद्योग दबला गेला आहे. त्यातच इथेनॉलच्या खरेदी दरात गेल्या तीन वर्षापासून वाढ झालेली नाही.

Indian Sugar Industry: साखर उद्योग आर्थिक संकटात; साखर दर घसरण आणि इथेनॉल दरवाढीचा अभाव कारणीभूत

दुसरीकडे साखरेच्या किमान विक्री दरात (Sugar MSP) गेल्या सहा वर्षात वाढ झालेली नाही. या सहा वर्षात कच्चा मालाच्या (ऊस) दरात मात्र २६ टक्के वाढ झालेली आहे. या दुहेरी संकटाच्या गर्तेत अडकलेल्या देशभरातील साखर उद्योगाच्या व्यथा आम्ही राष्ट्रीय सहकारी साखर महासंघातर्फे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमीत शहा, केंद्रीय अन्नमंत्री प्रल्हाद जोशी आणि केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी, यांना निवेदने दिली असून त्यांच्या समक्ष भेटीची वेळ मागितली आहे.

देशाचे साखर आणि जैव ऊर्जा क्षेत्र सध्या अत्यंत कठीण परिस्थितीतुन जात आहे. यात हस्तक्षप, सुधारणा आणि धोरणात्मक निर्णय ताबडतोबीने न झाल्यास त्याचे अत्यंत विपरीत आणि दुरगामी परिणाम होण्याची साधार भीती आहे. यात तातडीने सुधारणा न झाल्यास कोट्यावधी अल्प भूधारक ऊस उत्पादक शेतकरी ऊस थकबाकीच्या ओझ्याखाली दबू शकतात आणि त्याच्या परिणामस्वरुप धोरण कर्त्यासमोर गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते.

आकडेवारी – २०२५-२६ – २०२४-२५- फरक

गाळप घेतलेले कारखाने ४५४- ४५७ – -३

ऊसाचे गाळप ( लाख टन ) २४२० – २१७७ – + २४३

नवे साखर ऊपादन ( लाख टन ) २२५ – १९८ – + २७

सरासरी साखर उतार ( टक्के ) ९.३१ – ९.०९ – +०.२२

ग्रेनस्पॅनचे इथेनॉल उत्पादन क्षेत्रात मोठे पाऊल, ५२० कोटींची गुंतवणूक

इथेनॉल पुरवठ्या बाबतची १५ फेब्रुवारी अखेरची परिस्थिती

इथेनॉल वर्ष २०२५-२६ ( नोव्हेंबर २०२५ ते ऑक्टोबर २०२६)

१) इथेनॉल पुरवठादारांची ऑफर – १७७६ कोटी लिटर

२) तेल कंपन्यानकडूनची मागणी निश्चिती -१०४८ कोटी लिटर

१. धान्य इथेनॉल पुरवठा – ७५९ कोटी लिटर ( ७२ टक्के )

२. साखर उधोग इथेनॉल पुरठा – २८९ कोटी लिटर ( २८ टक्के )

३) आजतागायत झालेला पुरवठा – २४० कोटी लिटर

१. धान्य इथेनॉल पुरवठा – १५१ कोटी लिटर ( ६३ टक्के )

२. मळी इथेनॉल पुरवठा – ८८ कोटी लिटर ( ३७ टक्के )

४) साखरेचा इथेनॉलसाठी वापर १२ लाख टन

५) सरासरी इथेनॉल पेट्रोल मिश्रण १९.९८ टक्के

Web Title: Harshvardhan patil demand to central government to increase ethanol quota

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 08:28 PM

Topics:  

  • Harshvardhan Patil
  • Sugar Factory
  • Sugarcane Bill

संबंधित बातम्या

Chhatrapati Sugar Factory : ‘छत्रपती’च्या ऊस गळीत हंगामाची यशस्वी सांगता; 104 दिवसात तब्बल…
1

Chhatrapati Sugar Factory : ‘छत्रपती’च्या ऊस गळीत हंगामाची यशस्वी सांगता; 104 दिवसात तब्बल…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.