Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यातील अनेक भागांत पुन्हा मुसळधार पाऊस; पुढील 3-4 दिवस दिला इशारा, म्हटलं…

मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांना येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार मुंबई, ठाणे, कोकणसह राज्याच्या काही भागांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 29, 2025 | 07:20 AM
मुंबई, ठाण्यात मुसळधार

मुंबई, ठाण्यात मुसळधार

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. मान्सूनने महाराष्ट्राचा बराच भाग व्यापला असून, मुंबई-ठाण्यासह कोकणात बुधवारी पावसाचा जोर चांगलाच वाढलेला दिसला. पुढील 3-4 दिवसांत राज्याच्या विविध भागांत दमदार पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांना येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार मुंबई, ठाणे, कोकणसह राज्याच्या काही भागांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मागील २४ तासांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. कोकण, गोव्यातही जोरदार वाऱ्यांसह पावसाचा अंदाज आहे. मान्सूनने बुधवारी महाराष्ट्राचा बहुतेक भाग, कर्नाटकचा उर्वरित भाग, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिशातील काही भागांत प्रवेश केला.

हेदेखील वाचा : Pune Monsoon News: मान्सूनपूर्व पावसानेच जिल्ह्याची दाणादाण; गेल्या सहा दिवसांतील पावसाची सरासरी, पाहा आकडेवारी

महाराष्ट्राच्या विविध भागांत गेल्या ५ दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे २१ जणांचा मृत्यू झाला असून, १२ जखमी झाले आहेत. त्यात पाण्यात बुडून, वीज कोसळून तसेच भिंत कोसळून मृत्यू पावलेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. काही प्राण्यांनाही याचा फटका बसला. राज्याच्या वेळेच्या सुमारे १२ दिवस आधी आलेल्या मान्सूनमुळे पिकांना मोठा फटका बसला आहे.

अमरावती, बुलडाण्याला सर्वाधिक फटका

सुमारे ४१ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. उन्हाळ्यातील पिकांचा हाती-तोंडी आलेला घास निसर्गाने पळवला आहे. सर्वाधिक नुकसान झालेल्या जिल्ह्यांमध्ये अमरावती, बुलढाणा, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांचा समावेश आहे.

पश्चिम बंगाल, सिक्कीममध्ये पावसाचा अंदाज

तसेच पश्चिम बंगालचा उर्वरित भाग व्यापला आहे. पुढील दोन दिवसांत छत्तीसगड, ओडिशासह ईशान्येकडील काही राज्ये, पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या काही भागांत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. ओडिशाच्या किनारपट्टीजवळ बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा पट्टा हळूहळू उत्तरेकडे सरकेल आणि उत्तर बंगालच्या उपसागरावर तीव्र दाब क्षेत्र निर्माण होईल. यामुळे पश्चिम बंगाल व ओडिशात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

जनजीवन विस्कळीत

सध्या पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन अक्षरश: विस्कळीत झाले आहे. पशूधनासह वित्त आणि जीवितहानीही होताना दिसत आहे. त्यामुळे प्रशासनाकडूनही खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Web Title: Heavy rain in mumbai and thane

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2025 | 07:12 AM

Topics:  

  • Climate Change
  • Maharashtra Weather
  • Mumbai Rain
  • Weather Update

संबंधित बातम्या

राजधानी दिल्लीत वर्षातील पहिला थंड दिवसाची नोंद; दाट धुक्यामुळे हवेची गुणवत्ता आणखी खालावली
1

राजधानी दिल्लीत वर्षातील पहिला थंड दिवसाची नोंद; दाट धुक्यामुळे हवेची गुणवत्ता आणखी खालावली

Air Pollution Delhi : राजधानी दिल्लीत प्रदूषणामुळे हवा बनतेय विषारी; थेट मेंदूवर होतोय परिणाम…
2

Air Pollution Delhi : राजधानी दिल्लीत प्रदूषणामुळे हवा बनतेय विषारी; थेट मेंदूवर होतोय परिणाम…

देशातील अनेक भागांत थंडीचा कडाका; उत्तर भारतात धुक्याची चादरच, डोंगराळ भागांत बर्फवृष्टी
3

देशातील अनेक भागांत थंडीचा कडाका; उत्तर भारतात धुक्याची चादरच, डोंगराळ भागांत बर्फवृष्टी

काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’चा प्रभाव; अनेक भागांत बर्फवृष्टी व पावसाचा इशारा, गुलमर्ग-पहलगाममधील तापमान शून्याखाली
4

काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’चा प्रभाव; अनेक भागांत बर्फवृष्टी व पावसाचा इशारा, गुलमर्ग-पहलगाममधील तापमान शून्याखाली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.