'दादांच्या निधनामुळे प्रचारापासून दूर राहिलो'; मुरलीधर मोहोळ यांची भावूक प्रतिक्रिया
पुणे जिल्ह्याची प्रभारी म्हणून जबाबदारी असूनही, मोहोळ यांनी एकाही प्रचाराला हजेरी लावली नाही. “दादा गेल्यानंतर आम्हाला राजकारणात रस राहिला नव्हता. दादा स्वतः या निवडणुकीत ३५ ते ४० सभा घेणार होते,” असेही त्यांनी नमूद केले. पण “मतदार सुज्ञ आहेत, त्यांना जे योग्य वाटेल ते करतील. अनेक वर्षे राष्ट्रवादीची सत्ता आहे, पुढे जे होईल ते पाहिले जाईल,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
अजित पवार विमान अपघाताच्या उपस्थित होणाऱ्या शंका कुशंकांबाबत बोलताना म्हणाले की,” अपघाताबाबत सुरू असलेल्या चर्चांबाबत मोहोळ यांनी संयम ठेवण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला असून ‘एआयबी’ (AIB) आणि ‘डीजीसीए’ (DGCA) या यंत्रणा काम करत आहेत. डेटा डाऊनलोड केला जात असून लवकरच तांत्रिक अहवाल समोर येईल.
तसेच, “इतका मोठा नेता गेला आहे, हे राज्याचे नुकसान आहे. यावर कोणीही राजकारण करू नये. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः या प्रकरणात लक्ष घालून केंद्राकडे चौकशीची मागणी करत आहेत,” असे त्यांनी स्पष्ट केले.
पुणे महापालिकेच्या नवीन व्यवस्थेबाबत बोलताना मोहोळ म्हणाले की, “गेल्या तीन-चार वर्षांपासून शहराला प्रतिनिधी नव्हते. आता नवीन व्यवस्था आल्याने पाणीपुरवठा, वाहतूक व्यवस्था आणि नागरी सुविधा यावर आमचा विशेष भर असेल. पुण्याला देशातील सर्वात चांगले शहर बनवण्याचा आमचा संकल्प असून आमची जबाबदारी आता अधिक वाढली आहे, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, शरद बुट्टे पाटील यांना झालेल्या मारहाणीची माहिती घेऊनच प्रतिक्रिया देऊ, असे असंही त्यांनी सांगितलं. तर पुणे- मुंबई महामार्गावरील वाहतूक कोंडी अत्यंत भयानक होती, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करू, असे आश्वासन त्यांनी दिले.






