Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विभागीय आयुक्तांनी दखल न घेतल्यास उच्च न्यायालयात जाणार; दुष्काळी कामांच्या अनियमिततेवर झेडपी सदस्य देसाई आक्रमक

आयुक्त स्तरावर न्याय न मिळाल्यास आम्ही उच्च न्यायालयात धाव घेऊ. तसेच, आवश्यक असल्यास संबंधित अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचाही विचार आहे. त्यांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालावे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 07, 2026 | 11:24 AM
विभागीय आयुक्तांनी दखल न घेतल्यास उच्च न्यायालयात जाणार; दुष्काळी कामांच्या अनियमिततेवर झेडपी सदस्य देसाई आक्रमक

विभागीय आयुक्तांनी दखल न घेतल्यास उच्च न्यायालयात जाणार; दुष्काळी कामांच्या अनियमिततेवर झेडपी सदस्य देसाई आक्रमक

Follow Us
Follow Us:

सातारा : माण-खटाव तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती आणि विकासकामांतील कथित अनियमिततेच्या आरोपावरून राजकीय व प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हा परिषद प्रशासनावर थेट हल्लाबोल करत गंभीर आरोपांची सरबत्ती केली.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन यांच्या प्रशासकीय मानसिकतेवर देसाई यांनी कठोर टीका करत त्यांची तक्रार विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे केली असल्याचे सांगितले. तसेच या अनियमिततेच्या संदर्भाने उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचाही इशारा त्यांनी दिला.

अनिल देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, माण-खटाव तालुक्यासाठी दुष्काळ निवारणाच्या पार्श्वभूमीवर तब्बल १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. मात्र, प्रत्यक्षात कामांचा वेग शून्यच असल्याचा आरोप त्यांनी केला. विशेषतः ४३ कामांसाठी मंजूर असलेल्या १६ कोटी रुपयांसह एकूण ४९ कोटींच्या दुष्काळ निवारण निधीचा गेल्या सहा महिन्यांपासून योग्य वापरच झालेला नाही, अशी टीका त्यांनी केली. “निधी आहे, मंजुरी आहे; पण कामेच नाहीत, ही अत्यंत गंभीर बाब आहे,” असे देसाई म्हणाले.

टंचाई आढावा बैठकीत घडलेल्या प्रकारावरूनही त्यांनी संताप व्यक्त केला. “मी जलयुक्त शिवार, टँकरचे अंतर कमी करणे यासारखे महत्त्वाचे मुद्दे मांडत असताना झेडपीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन यांनी माझ्या हातातील माईक हिसकावून घेतला. हा केवळ माझाच नव्हे, तर लोकशाही प्रक्रियेचाच अवमान आहे,” असा आरोप त्यांनी केला. याप्रकरणी विभागीय आयुक्तांकडे तक्रार दाखल केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

स्मार्ट स्कूल योजनेच्या निधीबाबतही त्यांनी संशय व्यक्त करत, “या सर्व कामांमध्ये गैरव्यवहाराची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संपूर्ण चौकशी झाली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली. तसेच, “ठराविक लोकांना कामे देण्यासाठीच प्रशासनाचा कल असल्याचा संशय आहे,” असेही त्यांनी म्हटले. देसाई यांनी पुढे इशारा देत सांगितले की, “आयुक्त स्तरावर न्याय न मिळाल्यास आम्ही उच्च न्यायालयात धाव घेऊ. तसेच, आवश्यक असल्यास संबंधित अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचाही विचार आहे. त्यांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी केली.

दरम्यान, यंदा कमी पर्जन्यमानामुळे मान-खटाव तालुका दुष्काळाच्या छायेत असताना प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. “१४ महिन्यांपासून मंजुरी असूनही कामे होत नाहीत, हे प्रशासनाच्या निष्क्रियतेचे लक्षण आहे,” असा टोला त्यांनी लगावला. एकूणच, दुष्काळग्रस्त भागातील विकासकामांवरून उफाळलेला हा वाद आता अधिक तीव्र होण्याची चिन्हे असून, प्रशासनाने या आरोपांना काय उत्तर दिले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

7/12 Uatara : ७/१२ उतारा बंद, आता मिळणार ‘प्रॉपर्टी कार्ड’; शहरी भागातील रहिवाशांसाठी महसूल विभागाचा मोठा निर्णय

Web Title: If the divisional commissioner fails to take cognizance we will approach the high court says satara zp member anil desai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2026 | 11:24 AM

Topics:  

  • maharashtra news
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara News: पाणी द्या, नाहीतर गाव सोडावं लागेल! बनगरवाडीतील शेतकऱ्यांची सरकारकडे आर्त मागणी
1

Satara News: पाणी द्या, नाहीतर गाव सोडावं लागेल! बनगरवाडीतील शेतकऱ्यांची सरकारकडे आर्त मागणी

Satara News : जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर किशोर सोनवणे यांचे उपोषण अखेर मागे
2

Satara News : जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर किशोर सोनवणे यांचे उपोषण अखेर मागे

दाभोळकर हत्या प्रकरणातील आरोपींना जामीन, साताऱ्यात संताप, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
3

दाभोळकर हत्या प्रकरणातील आरोपींना जामीन, साताऱ्यात संताप, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचा कळस! सिझेरियननंतर महिलेच्या पोटात सर्जिकल ग्लोव्हज अन् पेपर नॅपकिन
4

डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचा कळस! सिझेरियननंतर महिलेच्या पोटात सर्जिकल ग्लोव्हज अन् पेपर नॅपकिन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.