अनेक जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट (फोटो- ani)
राज्याला मुसळधार पावसाचा इशारा
कोकणाला पावसाचा ऑरेंज अलर्ट
राज्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता
IMD Rain Alert: राज्यभरात सध्या पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र हवामान विभागाने येत्या काही दिवसांत राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. आजपासून पुढील दोन ते तीन दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोणत्या भागात कोणता अलर्ट देण्यात आलेला आहे, याबाबत जाणून घेऊयात.
पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील कोकण किनारपट्टी, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने राज्याला पावसाचा अलर्ट दिला आहे. मुंबई आणि उपनगराला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईत अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, पुणे जिल्हा , सातारा जिल्ह्यात पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.
मुसळधार पावसासह राज्यभरात वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत राज्यभरात जोरदार पाऊस होऊ शकतो. पुणे, सातारा, घाटमाथा ani कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे थोडीशी विश्रांती घेतलेला पाऊस राज्यात पुन्हा एकदा सक्रिय होताना पाहायला मिळणार आहे.
राज्यात पावसासाठी अनुकूल हवामान तयार झाले आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्टा निर्माण झाल्याने हे वातावरण तयार झाले आहे. कोकण किनारपट्टीवर पाऊस धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, चंद्रपूर व गोंदियात जिल्ह्यात पावसाचा इशारा वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.