Rain News: कालपासून रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. नागरिकांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. 30 सप्टेंबरपर्यन्त समुद्र खवळलेला राहणार आहे.
सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने राज्यातील बरीचशी धरणे देखील पूर्ण क्षमतेने भरली आहेत. दरम्यान आज देखील राज्यभरात पाऊस होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
राज्यात पावसासाठी अनुकूल हवामान तयार झाले आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्टा निर्माण झाल्याने हे वातावरण तयार झाले आहे. कोकण किनारपट्टीवर पाऊस धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे.
Monsoon Alert: पुढील 5 ते 6 दिवसांमध्ये राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात पाऊस धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे.
Rain Marathi News: उंच लाटांचा इशारा देण्यात आलेल्या कालावधीत समुद्राची स्थिती खवळलेली व ताशी ५०-६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Rain Marathi News: सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असल्याने नदीपात्रात 80 हजार क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे.
गेले काही दिवस राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. पावसाने कोकण किनारपट्टीला झोडपून काढले आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी, शास्त्री, कोदवली या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे तसेच रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली असून जिल्हा प्रशासना मार्फत सतर्क राहण्याची सूचना देण्यात आली आहे.
IMD Rain Alert: देशभरात आज ७९ व्या स्वातंत्र्यदिनाच्या उत्साह पाहायला मिळत आहे. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी देशभरातील अनेक ठिकाणी पावसाने देखील हजेरी लावली आहे.
Rain Marathi News: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाराष्ट्रात पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा जोरदार पाऊस होणार आहे.
कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरणात ९१ हजार ५४८ क्युसेक इतकी आवक होत असून धरणातून १ लाख २० हजार क्युसेक पाण्याची जावक असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.
Heavy Rain In Maharashtra: पुणे, विदर्भातील काही जिल्ह्यात आणि मुंबईसह कोकणात जोरदार पाऊस कोसळत आहे. येत्या काही तासांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
Monsoon Alert: उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये पावसाने कहर केला आहे. अनेक ठिकाणी दरड कोसळली आहे. त्यामुळे दोन्ही राज्यात अनेक ठिकाणी महामार्ग आणि अन्य मार्ग बंद करण्यात आले आहेत.
गेले दोन ते तीन दिवस कोकणात मुसळधार पाऊस सुरु आहे. पुढील २४ तासांसाठी कोकणाला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी हा अलर्ट देण्यात आला आहे.
Maharashtra Rain Alert: गेले काही दिवस कोकणातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये तसेच सातारा घाट, कोल्हापूर घाट या भागात पुढील २४ तासासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असल्याने जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.