
राज्याला मुसळधार पावसाचा इशारा
पुढील ३ दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा
पुन्हा पाऊस आल्यास थंडी कमी होण्याचा अंदाज
Maharashtra Weather Update: महाराष्ट्रावर पुन्हा एकदा पावसाचे संकट येण्याची शक्यता आहे. गेल्या दोन चार दिवसांपासून राज्यात थंडीचे वातावरण पाहायला मिळत आहे. सकाळी आणि रात्रीच्या वेळेस हवेत गारठा जाणवत आहे. मात्र राज्यावर पुन्हा एकदा पावसाचे संकट येण्याचा अंदाज आहे. भारतीय हवामान विभागाने नेमका काय इशारा दिला आहे, ते जाणून घेऊयात.
Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रावर मोठे संकट येणार! पुढील 3 दिवस…; शेतकरी चिंतेत
राज्यात पुढील काही दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. राज्यात पुढील काही दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यावर पावसाचे ढग कायम आहेत. राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नोव्हेंबर महिना सुरू झाला तरी पुस सुरू असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
मध्यंतरी पाऊस थांबल्याने गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडी पडण्यास सुरुवात झाली होती. पारा घसरल्याचे दिसून येत होते. सकाळच्या आणि रात्रीच्या वेळेस हवेत गारवा जाणवत होता. मात्र पुन्हा एकदा राज्यात पावसाचा इशारा देण्यात आल्याने थंडी कमी होण्याची शक्यता आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू होता. अवकाळी पावसाने राज्यात कहर केल्याचे दिसून आले. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. पिके उद्ध्वस्त झाली. दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने थंडी पडायला सुरूवात झाली असे वातावरण तयार झाले होते. मात्र आता पुढील काही दिवस राज्यात पुन्हा एकदा पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे.
भारतीय हवमान विभागाने राज्यात पावसाचा इशारा दिला आहे. पुढील दोन ते तीन दियास राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. पुणे, सांगली, कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार वाऱ्यासाह पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. हवामान विभागाने r राज्यातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
मोंथा चक्रीवादळानंतर आणखी एका चक्रीवादळाचा अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. पश्चिमी विक्षोभ सक्रिय झाल्याने देशासह राज्यातील अनेक भागात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच राज्यात पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आल्याने शेतकरी चिंतेत आहे.