Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आंबेगाव तालुक्यात दुष्काळाचे सावट, पावसाचे पाणी आटले; यंदा केवळ २२ टक्के पाऊस

आंबेगाव तालुक्यात पावसाने दांडी मारल्याने तालुक्यात सर्वत्र दुष्काळाचे सावट दिसून येत आहे. सध्या पावसाअभावी परिस्थिती अतिशय गंभीर होत चालली असून तालुक्यात काही ठिकाणी पाऊस पडला, मात्र तोही अल्प प्रमाणात पडला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 04, 2023 | 07:35 AM
आंबेगाव तालुक्यात दुष्काळाचे सावट, पावसाचे पाणी आटले;  यंदा केवळ २२ टक्के पाऊस
Follow Us
Close
Follow Us:

आंबेगाव : आंबेगाव तालुक्यात पावसाने दांडी मारल्याने तालुक्यात सर्वत्र दुष्काळाचे सावट दिसून येत आहे. सध्या पावसाअभावी परिस्थिती अतिशय गंभीर होत चालली असून तालुक्यात काही ठिकाणी पाऊस पडला, मात्र तोही अल्प प्रमाणात पडला आहे. पावसाच्या गैरहजेरीमुळे सर्वसामान्यांना आर्थिक दृष्ट्या देखील आता संकटांचा सामना करावा लागत आहे. पावसाची परिस्थिती अत्यंत भयावह आणि चिंताजनक आहे . तालुक्यात यंदा केवळ २२ टक्के पाऊस पडला असुन सद्य परिस्थिती गंभीर झाली आहे. पावसाचे पाणी देखील आटले आहे.

दरम्यान यावर्षी तालुक्यात पावसाची टक्केवारी अत्यंत कमी असल्याने आगामी काळात पाण्यामध्ये तूट पडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. डिंभे धरणात उपलब्ध पाणीसाठा सध्या पुरेसा असला तरी पाऊस पडला नाही तर धरणातील पाणीसाठा नागरीकांना पिण्यासाठी साठवुण ठेवावा लागु शकतो. यंदा ऑगस्ट महिन्यातच पाणीटंचाई भासायला सुरुवात झाली. आता सप्टेंबर महिना सुरू झाला आहे. मात्र या महिन्यात उन्हाच्या तीव्र झळा जाणवु लागल्या आहे. सध्या पावसाच्या सुरू असलेल्या लपंडावामुळे अनेक भागात भीषण पाणी टंचाई दिसून येते. परिणामी अनेक गावांना आणि वाड्या – वस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हवामानातील अमुलाग्रह बदल, जंगलतोड, वाढते औद्योगीकरण आणि परमाणु परीक्षण यामुळे निसर्गाचे संपूर्ण संतुलन डगमगले आहे. दिवसेंदिवस निसर्ग कोपत आहे . त्याचाच परिणाम भोगावा लागतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील पश्चिम भागातील भातपीक देखील आता पावसाअभावी धोक्यात आले आहे तर पूर्व भागातील सर्वच पिके धोक्यात असून, या पिकांना पावसाची नितांत गरज आहे. पावसाच्या गैरहजेरीमुळे बळीराजाला अनेक कठीणाईचा सामना करावा लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

चालू महिन्यात पुरेशा प्रमाणात पाऊस पडला नाही तर यावर्षी आगामी काळात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो. म्हणजे सर्वच गोष्टींचा विचार केला तर परस्थिती अत्यंत कठीण आणि गंभीर आहे . त्यामुळे असं झालं आहे की ‘पाणी आटलं आणि डोळ्यात साठलं ‘ सध्याच्या परिस्थितीत तर तालुक्याच्या काही भागात उन्हाळ्यासारखे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांची अशी परिस्थिती झाली आहे की जगावे की मरावे, अशा परिस्थितीला बळीराजा सध्या सामोरे जात आहे.

यंदाचा पावसाळी खरीप हंगाम जवळजवळ वाया गेला आहे तर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. यापुढील काळात समाधानकारक पाऊस पडलाच नाही तर दुष्काळ अटळ आहे. शेतीच्या पाण्याचे सोडा पण पिण्याच्या पाण्याची आणि जनावरांच्या चाऱ्याची समस्या खूप गंभीर होऊ शकते. शेतीचा जोडधंदा असलेल्या पशुपालन व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणात संकटात आला आहे. पाणी नाही, पिके नाहीत, चारा नाही त्यामुळे जनावरांची उपासमार सुरू झाली आहे. खरीप वाया गेल्याने सर्वत्र पशु आहारात ‘न भुतो, न भविष्यती ‘अशी अवस्था झाली आहे. महागाईच्या काळात आता जनावरांचे पालन पोषण करणे देखील आता महागात पडत आहे. एकीकडे चारा महाग होत आहे तर दुसरीकडे दुधाच्या दरात वाढ होत नाही त्यामुळे शेतकरी वर्ग दुहेरी संकटात सापडला आहे.

Web Title: In ambegaon taluk drought subsided rain water dried up this year only 22 percent rain nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2023 | 07:35 AM

Topics:  

  • Ambegaon
  • cmomaharashtra
  • maharashtra
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

भारतीय संस्कृतीचा वारसा जपा आणि विकसित भारताच्या संकल्पात योगदान द्या; राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे युवकांना आवाहन
1

भारतीय संस्कृतीचा वारसा जपा आणि विकसित भारताच्या संकल्पात योगदान द्या; राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे युवकांना आवाहन

महाराष्ट्रात बनावट प्रमाणपत्रांचा महाघोटाळा! १,३०० लोकसंख्येच्या गावातून २७ हजार दाखले; मुंबई कनेक्शन उघड
2

महाराष्ट्रात बनावट प्रमाणपत्रांचा महाघोटाळा! १,३०० लोकसंख्येच्या गावातून २७ हजार दाखले; मुंबई कनेक्शन उघड

महाराष्ट्रात वसलेलं ही ठिकाणं म्हणजे भारतातील इटलीच… इथे एकदा जाल तर परत येण्याची इच्छाच होणार नाही
3

महाराष्ट्रात वसलेलं ही ठिकाणं म्हणजे भारतातील इटलीच… इथे एकदा जाल तर परत येण्याची इच्छाच होणार नाही

Deepak Kesarkar: “निवडणूक आयोगावर आक्षेप घेणाऱ्यांना पराभव डोळ्यासमोर दिसतोय…”, दिपक केसरकर यांची संजय राऊतांवर टीका
4

Deepak Kesarkar: “निवडणूक आयोगावर आक्षेप घेणाऱ्यांना पराभव डोळ्यासमोर दिसतोय…”, दिपक केसरकर यांची संजय राऊतांवर टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.