
एका महिन्याभरात या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढत असल्यामुळे पालकांच्या मनात आपल्या पाल्यांविषयी भीती निर्माण होत आहे. या मार्गावरून पाताळगंगा औद्योगिक क्षेत्राकडे जाणा-या वाहनांची रहदारी सुरुच असते. यावेळी दांडमार्गे येणारी वाहने खाने आंबिवली या चढ उताराचा रस्त्यावरून चढण चढताना तसेच उतरताना याचवेळी खाने आंबिवली गावातून येणारी वाहने तसेच गावात प्रवेश करणारी वाहने रस्त्यावर येताच दिसेनासे होत असल्याने शिवाय भरधाव वाहनांच्या गतीवर नियंत्रण येत नसल्याने अपघातांची मालिका सुरूच आहे.
या वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी गतिरोधकाची आवश्यकता आहे. या रस्त्यावर अवजड वाहने मोठ्या प्रमाणात रेलचेल असल्यामुळे अपघाताची समस्या गंभीर होत आहे.खाने आंबिवली थांब्यासमोर हरि गोपाळे,जयराम गोपाळे, मंगेश सखाराम खाने,रामू जितेंद्र खाने, श्री राजेंद्र यांचा वाहनाला गेल्या आठवड्यात अपघात होऊन कोणाचा हात तर कोणाला आपला पाय गमवावा लागला आहे.तर अपघातात काहींनी जीवही गमावला आहे.दरम्यान खाने आंबिवली जवळ गतीरोधक त्याच बरोबर वाहनांची गती कमी करण्याचे फलक लावण्याची खाने आंबिवली ग्रामस्थांसह रसायनी कर तसेच प्रवासीवर्गांतून होत आहे. तरी खाने आंबिवली थांब्यासमोर सार्वजनिक बांधकाम विभागाने गतिरोधक न लावल्यास नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.