Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार; ‘या’ दोन नेत्यांचा अजित पवारांच्या पक्षात प्रवेश

राज्याच्या विकासासाठी शेतकरी, तरुण-तरुणी मागे राहू नये यासाठी आम्ही शिव-शाहू-फुले-आंबेडकर विचार न सोडता सत्तेत सहभागी झालो आहोत. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी राज्यात सर्वात आधी बेरजेचे राजकारण सुरू केले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 26, 2025 | 10:54 AM
नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा मतदारसंघातच तळ; दादा भुसेंसह गिरीश महाजनही राजकीय मैदानात...

नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा मतदारसंघातच तळ; दादा भुसेंसह गिरीश महाजनही राजकीय मैदानात...

Follow Us
Close
Follow Us:

कोल्हापूर : सर्वधर्म समभाव विचार घेऊन चालणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. आश्वासक चेहरा म्हणून तुम्ही राहुल पाटील आणि राजेश पाटील यांच्याकडे पाहत आहात. तुमच्या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कोल्हापूर जिल्ह्यात ताकद वाढणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत खूप मोठा फायदा होणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

स्वर्गीय आमदार पी. एन. पाटील गटाचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश झाला. अजित पवार म्हणाले की, ‘राज्याच्या विकासासाठी शेतकरी, तरुण-तरुणी मागे राहू नये यासाठी आम्ही शिव-शाहू-फुले-आंबेडकर विचार न सोडता सत्तेत सहभागी झालो आहोत. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी राज्यात सर्वात आधी बेरजेचे राजकारण सुरू केले. काळजी करू नका, तुमच्या सगळ्यांच्या मनात आहे ते पूर्ण करू, राहुल भैयांनी चूक केली असे वाटू देणार नाही; हा अजितदादांचा ‘शब्द’ आहे.

तसेच, मित्रांनो, मी कामाचा माणूस आहे. जन्माला आल्यानंतर समाजासाठी काम करायला पाहिजे. शेतकऱ्यांना कुठेही अडचण येणार नाही, यासाठी काम करायचे असते. लोकसभा निवडणुकीनंतर खचलो नाही, आम्ही जनतेच्या दारात पुन्हा गेलो. घेतलेलं कर्ज परतफेड करणारा शेतकरी हा केवळ कोल्हापूर जिल्ह्यात पाहायला मिळतोय. आम्ही शेतकऱ्यांना सोलरवर वीज देण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

…ते येत्या काळात पूर्ण करू

पी. एन. पाटील आणि विलासराव देशमुख यांचे संबंध सांगत असताना लातूर आणि सडोली खालसा एक समीकरण झाले होते. आता यापुढे सुद्धा सडोली खालसा आणि काटेवाडी नात कशा पद्धतीने असेल हा संपूर्ण महाराष्ट्र पाहील, काळजी करू नका. तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये जे आहे ते येत्या काळात पूर्ण करू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

राहुल पाटील, राजेश पाटील यांचा प्रवेश

पी. एन. पाटील यांचे चिरंजीव राहुल आणि राजेश पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. पी .एन .साहेब आज नसले तरी ते आज आपल्याला पाहत आहेत. आपला कार्यकर्ता कसा वागतो आहे, असे अजित पवार यावेळी म्हणाले. पी. एन .पाटील यांनी राजीव गांधी यांना नेता मानले, नंतर विलासराव देशमुख यांना नेता मानले, त्यांना कधी सोडले नसल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Rahul patil and rajesh patil join ncp in kolhapur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2025 | 10:54 AM

Topics:  

  • ajit pawar
  • kolhapur news
  • Maharashtra Politics
  • political news
  • Rahul Patil
  • Rajesh Patil

संबंधित बातम्या

पंतप्रधान मोदींनी हवेत फिरवला मफलर; विजयाच्या उत्साह आणि आनंदाला आले भरते
1

पंतप्रधान मोदींनी हवेत फिरवला मफलर; विजयाच्या उत्साह आणि आनंदाला आले भरते

Maharashtra Politics: मराठीच्या मुद्द्यावरून शिंदेंची ‘उबाठा’ सडकून टीका; म्हणाले, “…काही केलं नाही”
2

Maharashtra Politics: मराठीच्या मुद्द्यावरून शिंदेंची ‘उबाठा’ सडकून टीका; म्हणाले, “…काही केलं नाही”

आत्तापर्यंत 16 BLO चा झाला मृत्यू; SIR वर घेतला जातोय संशय
3

आत्तापर्यंत 16 BLO चा झाला मृत्यू; SIR वर घेतला जातोय संशय

जनतेच्या हातात कटोरा आहे का? तिजोरीच्या चाव्यांवर महायुतीच्या नेत्यांमध्ये जुंपली, शिरसाटांनी सुनावलं
4

जनतेच्या हातात कटोरा आहे का? तिजोरीच्या चाव्यांवर महायुतीच्या नेत्यांमध्ये जुंपली, शिरसाटांनी सुनावलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.