
Maharashtra Politics: राजकारणात मोठा भूकंप होणार? 'हा' बडा नेता ठाकरेंची साथ सोडणार?
माजी खासदार उन्मेष पाटील उद्धव ठाकरेंची साथ सोडणार
निवडणुकीनंतरही राज्यात पक्षांतर सुरूच
ठाकरेंच्या पक्षाची अनेक नेत्यांनी सोडली साथ
मुंबई: राज्याच्या राजकारणात सातत्याने काही घडामोडी घडत आहेत. राज्यात नुकत्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या आहेत. नगरपरिषद, महानगरपालिका. पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये महायुतीने दणदणीत यश मिळवले. निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात पक्षांतर झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र हे पक्षांतर अजूनही सुरूच असल्याचे दिसून येत आहे. उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
माजी खासदार आणि ठाकरे गटाचे नेते उन्मेष पाटील हे उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार असल्याचे म्हटले जात आहे. आधी भाजपातून ठाकरे गटात आले उन्मेष पाटील उद्धव ठाकरेंच्या पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र म्हणण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. उन्मेष पाटील एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
6 मार्च रोजी उन्मेष पाटील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे समजते आहे. त्यांनी ठाकरे गटाची साथ सोडली तर उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का असणार आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात आणखी एक पक्षांतर पाहायला मिळण्याची शक्यता आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत उन्मेष पाटील शिवसेनेत प्रवेश करणार असे म्हटले जात आहे.
Maharashtra Politics: राज्यात मोठी घडामोड! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याने सोडली साथ
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का
डोंबिवलीमध्ये ठाकरेंच्या पक्षाला मोठा धक्का बसला आहे. डोंबिवलीमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. अनेक नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. डोंबिवलीमधील जिल्हाप्रमुख आणि अनेक पदाधिकारी, विभाग प्रमुख, उप विभाग प्रमुख, शाखा प्रमुख यांच्यासह अनेक ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. अजूनही पक्षांतर सुरूच असून डोंबिवलीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मोठा धक्का बसला आहे. अनेक नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
Maharashtra Politics: टिपू सुलतानवरून CM फडणवीस आक्रमक; म्हणाले, “… अपमान सहन करणार नाही”
टिपू सुलतानवरून CM फडणवीस आक्रमक
ल्या काही दिवसांपासून राज्यात टिपू सुलतान वरून वाद सुरू आहे. कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली. त्यानंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेतला. आज या सर्व विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात प्रत्युत्तर दिले.