
गत वर्षी मे पासून दमदार पाऊस पडल्याने हा तलाव जून मध्येच पूर्ण क्षमतेने भरला होता त्यानंतर या तलावातून तळीये,देऊर मधील परवाना धारक शेतकऱ्यांनी या तलावातील पाण्याचा उपसा केला त्यामुर त्यामुळे या तलावातील पाणी पातळी खालावली होती यातच सध्या जून महिना सुरू झाला तरी अद्याप कसलाही पाऊस पडत नसल्याने सध्या पाणी टंचाई जाणवू लागली आहे.
याच तलावात देऊर गावाच्या पिण्याच्या पाण्यासाठी विहीर देखील काढण्यात आली आहे मात्र केवळ या विहिरीतल पाणी पूजनासाठी एक दिवस सोडण्यात आल्यानंतर ही पाणी योजना जागेवरच राहिली आहे.
सध्या देऊर मध्ये 4 दिवसातून एक वेळ पाणी मिळत आहे पाऊस न पडल्यास टंचाई अधिक तीव्र होईल अशी परस्थिती असताना या तलावातील ही पाणी योजना सुरू होण् गरजेचं आहे यासाठी प्रयत्न होणे अपेक्षित आहे.
मागील वर्षी एप्रिल महिन्यात हा तलाव पूर्ण कोरडा पडला होता तशी परस्थिती येऊ नये यासाठी या तलाव परिसरातील सर्व वीज कनेक्शन तत्काळ तोडावी लागतील तसेच तलावातील गुप्त पाणी चालणाऱ्या मोटारी शोधण्यासाठी लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
देऊर पाझर तलाव हा या भागातील दोन ते तीन गावांच्या पाण्यासाठी महत्वाचा असताना या तलावात केवळ जमिनी वरून नव्हे तर जमिनीच्या खालून तलावात मोटारी केबल आहेत ज्या वरून दिसत नाहीत त्यांचा शोध घेण्याची गरज आहे तरच या तलावातील पाणी भविष्यात काही दिवस कामाला येईल. ज्ञानदेव कदम, माजी जिल्हा उपाध्यक्ष , स्वाभिमानी शेतकरी संघटना