Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Manoj Jarange Patil : शेतकऱ्यांसाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक; राज्यभरात आंदोलन पेटणार

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील शेतकऱ्यांना मदत मिळण्याच्या मागणीसाठी आक्रमक झाले आहेत. मदत नाही मिळाली तर पाटलांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 23, 2025 | 02:47 PM
पोलिस संरक्षण नाकारत जरांगेंचा पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; 'धनंजय मुंडेंना...'

पोलिस संरक्षण नाकारत जरांगेंचा पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; 'धनंजय मुंडेंना...'

Follow Us
Close
Follow Us:
  • पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
  • शेतकऱ्यांसाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक
  • राज्यभरात आंदोलनाचा दिला इशारा
जालना : गेेले काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडला आहे. या मुसळधार पावसामुळे अतिवृष्टी आणि वादळामुळे मराठवाड्यासह विविध भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास मातीमोल झाला असून बळीराजावर संकट कोसळलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने मदतीची गरज आहे. गेल्या काही दिवसाखाली सरकारने मदत जाहीर केली असली तरीही ती मदत काही शेतकऱ्यापर्यंत पोहचली नाही. अशातच आता मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील शेतकऱ्यांना मदत मिळण्याच्या मागणीसाठी आक्रमक झाले आहेत. पाटलांनी मदत नाही मिळाली तर आंदोलनाचा इशारा दिला आहे.

जरांगे पाटील म्हणाले, आज भाऊबीजेच्या दिवशी आम्ही यादी तयार करतोय. लवकरच बैठक घेऊन शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन उभारणार आहे. अनेक ठिकाणी सरकार पेक्षा अधिकारी मोठे झाले आहेत. जे अधिकारी काम करत नाही त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजेत. दिलेली मदत ही मदत म्हणता येणार नाही. तो तात्पुरता आनंद आहे. जसं की फडणवीस हे प्रत्येकाला तात्पुरता आनंद देतात. धनगर समाजाला देखील तात्पुरता आनंद दिला. शेतकऱ्याचे काम करणारे अभ्यासक, तज्ञ, नेते एकत्र बसू. सगळ्यांना फोन करून बोलावणार आहे, असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले.

आमच्याकडे एकच इमानदारीने लढण्याची आणि ती जिंकण्याची गोष्ट आहे. सर्व संघटनेचे, पक्षाचे शेतकरी नेते आम्ही अंतरवालीत बोलावणार. पहिला टप्पा एकत्र बसून चर्चा करु. नंतर सर्वांची बैठक आणि त्यानंतर आंदोलनाची दिशा ठरवणार. आमदारांकडे हजारो कोटींच्या प्रॉपर्ट्या आहेत. तरी त्यांना पाच कोटी देण्यात येत आहेत. भाऊबीज निमित्त लाडक्या बहिणीला लाडक्या दाजीला सगळ्यांना न्याय दिल्याशिवाय शांत बसायचं नाही. असं ऐतिहासिक आंदोलन पुन्हा होणार नाही हे देश सुद्धा पाहिल. हमीभाव कसा होत नाही, कर्जमुक्ती कशी भेटत नाही, शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना कशा नोकऱ्या देत नाहीत तेही बघू. शेतकऱ्यांना आणि शेतीला नोकरीचा दर्जा देण्याची मागणी करणार आहे. सोनं, चांदी सगळं वाढलं, त्यांचं पाणीही वाढलं मात्र आमच्या दुधाला भाव मिळाला नाही, असेही जरांगे म्हणाले.

झेंडूला 10 रुपये किलो देखील भाव नाही

पंढरपूर तालुक्यात काही शेतकऱ्यांनी आपल्या झेंडूच्या फुलांना बाजारात कवडीमोल भाव मिळाल्यामुळे संतप्त होऊन ती फुलं थेट रस्त्यावर फेकून दिले आहेत. राज्यात दिवाळीचा सण साजरा होत असताना पंढरपूर तालुक्यात काही शेतकरी संतप्त झाल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्याने दिवाळीच्या निमित्ताने मोठ्या अपेक्षेने आणि खर्च करून झेंडूची फुलं बाजारात विक्रीसाठी आणली होती. मात्र, बाजारात १० रुपये किलो देखील भाव मिळत नसल्याने त्यांना संताप अनावर झाला. वाहतूक, तोडणी आणि मजुरीचा खर्चही निघणार नाही, हे लक्षात येताच शेतकऱ्याने रस्त्यावरच फुलं फेकून आपला निषेध नोंदवला.

Web Title: Manoj jarange patil has announced a statewide agitation for farmers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2025 | 02:46 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Farmers
  • Manoj Jarange Patil

संबंधित बातम्या

मामाच्या गावाला जाणं महागलं! एसटीची 10 टक्के हंगामी भाडेवाढ; प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार
1

मामाच्या गावाला जाणं महागलं! एसटीची 10 टक्के हंगामी भाडेवाढ; प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार

खासदार प्रणिती शिंदेंच्या पाठपुराव्याला यश, उजनीतून भीमा नदीत पाणी सुटणार; मोहोळसह पाच तालुक्यांना मोठा दिलासा!
2

खासदार प्रणिती शिंदेंच्या पाठपुराव्याला यश, उजनीतून भीमा नदीत पाणी सुटणार; मोहोळसह पाच तालुक्यांना मोठा दिलासा!

Pune News : कृषी विभागाचा दणका; पुणे जिल्ह्यातील15 कृषी केंद्रांचे परवाने निलंबित
3

Pune News : कृषी विभागाचा दणका; पुणे जिल्ह्यातील15 कृषी केंद्रांचे परवाने निलंबित

कृषी विभागाचा राज्य सरकारला अहवाल; 8500 शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता
4

कृषी विभागाचा राज्य सरकारला अहवाल; 8500 शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.