Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अनंत गीतेंनी केंद्राच्या माध्यमातून कोणते मोठे प्रकल्प आणले हे रायगडच्या जनतेसमोर मांडावे – आ. प्रविण दरेकर

१० वर्षाच्या काळात देशाचे पंतप्रधान पायाला भिंगरी लावून काम करत आहेत. या देशात कधीच असा पंतप्रधान झाला नाही जो २४ तास काम करतो. माझा संपूर्ण देश परिवार आहे, मला जे काही करायचे आहे ते गरीबाच्या कल्याणासाठी करायचेय, जगात भारत देश विकसित झाला पाहिजे, युवा, महिला, शेतकरी यांच्यासाठी मला काम करायचेय या भावनेतून पंतप्रधान मोदी दिवस रात्रं काम करताहेत. म्हणून मोदींना मतदान करायचेय, असेही दरेकर म्हणाले.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Apr 22, 2024 | 03:18 PM
अनंत गीतेंनी केंद्राच्या माध्यमातून कोणते मोठे प्रकल्प आणले हे रायगडच्या जनतेसमोर मांडावे – आ. प्रविण दरेकर
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : अनंत गीते यांना पाच-सहा वेळा रायगड लोकसभेचे खासदार म्हणून नेतृत्व करण्याची, त्याचबरोबर मंत्रिपद भूषविण्याची संधी मिळाली. गीतेंनी आपल्या कारकिर्दीत कोणती विकासाची कामे केली, केंद्राच्या माध्यमातून कोणते मोठे प्रकल्प आणले हे त्यांनी रायगडच्या जनतेसमोर मांडावे, असे आव्हानच भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी दिले आहे.

रायगड लोकसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ आज महाड विधानसभेतील मुंबईवासियांचा जाहीर मेळावा पार पडला. या मेळाव्यात आमदार दरेकर बोलत होते. याप्रसंगी महाडचे शिवसेना आमदार, प्रतोद भरत गोगावले, रायगड जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख अरुण चाळके, रायगड जिल्हा शिवसेना जिल्हा प्रमुख मनोज घोसाळकर, भालचंद्र शिरसाट, अविनाश जाधव, गजानन पवार, इकबालशेख चांदे, राज पार्टे, यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी आपल्या भाषणात बोलताना दरेकर म्हणाले की, कोकणातील शिवसेनेचे जे आमदार, खासदार निवडून आले आहेत त्यांना निवडून आणण्यात मुंबईकर कार्यकर्त्यांचा सिंहाचा वाटा होता. म्हणून सुनील तटकरे यांच्या निवडणुकीच्या निमित्ताने हा मेळावा अत्यंत महत्वाचा आहे. ही निवडणूक केवळ लोकसभेची नाही तर देशाकरिता होणारी निवडणूक आहे. ही निवडणूक तिसऱ्यांदा या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत यासाठी आहे. देशाचे भविष्य घडविणारी ही निवडणूक आहे. खऱ्या अर्थाने देशाला विकसित भारत करायचे असेल, उद्याच्या पिढ्यांचे भविष्य सुरक्षित करायचे असेल त्या दृष्टीनेही ही निवडणूक अत्यंत महत्वाची असल्याचे दरेकर म्हणाले.

दरेकर पुढे म्हणाले की, रायगड लोकसभा क्षेत्रात केवळ एक आमदार सोडला तर पाचही आमदार हे आपल्या महायुतीचे आहेत. या आमदारांनी सरकारच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघात विकासाची कामे मोठ्या प्रमाणावर केली आहेत. एवढे सगळे नेते, आमदार असताना अनंत गीते यांची डाळ आपल्यासमोर कशी काय शिजणार हा प्रश्न आहे. अनंत गीते यांना पाच-सहा वेळा लोकसभेचे खासदार म्हणून नेतृत्व करण्याची, त्याचबरोबर मंत्रिपद भूषविण्याची संधी मिळाली. गीतेंनी आपल्या कारकिर्दीत कोणती विकासाची कामे केली, केंद्राच्या माध्यमातून कोणते मोठे प्रकल्प आणले हे त्यांनी रायगडच्या जनतेसमोर मांडावे, असे आव्हानच दरेकर यांनी गीतेंना दिले.

दरेकर पुढे म्हणाले की, सुनील तटकरे यांनी रायगडचे पालकमंत्री, खासदार म्हणून असो आणि आमचे जे आमदार आहेत. त्यांच्या माध्यमातून झालेली लोकहिताची कामे याची तुलना केली तर एक टक्का पण कामे गीते किंवा उबाठा गट करू शकले नाहीत. ही निवडणूक केवळ तटकरेंना खासदार बनविण्यासाठी नाही तर या देशाचा पंतप्रधान कोण बनणार हे ठरविणारी आहे. जे मतदान आपल्या गावच्या लोकसभेतून होणार आहे ते पंतप्रधानांना होणार आहे. मोदी पंतप्रधान होणार असतील आणि खासदार त्यांना मतदान करणार असतील त्यावेळी छत्रपतींच्या भूमितील खासदार हा मोदींना मतदान करणारा असावा ते करण्याचे काम तुम्हाला करायचे आहे, असे आवाहनही दरेकर यांनी केले. तसेच यावेळी दरेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारने केलेल्या विकास कामांची, योजनांची माहितीही उपस्थित जनसमुदायाला दिली.

उद्धव ठाकरेंवर तोफ डागताना दरेकर म्हणाले की, उद्धव ठाकरेंकडे बोलायला काही नाही. मोदींच्या कारकिर्दीवर टीका करायला मुद्दे नाहीत, मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर केवळ गद्दार आहेत अशी टीका करायची परंतु शिंदे यांच्या कामाबाबत एकही टीका उद्धव ठाकरे करु शकत नाहीत. कारण त्यांना अडीच वर्षाच्या काळात जे जमले नाही ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार मुंबईसह महाराष्ट्रासाठी काम करताना दिसत आहे. अडीच वर्षाच्या काळात उद्धव ठाकरे यांचे सरकार असताना केंद्रातून एक दमडीही त्यांनी आणली नाही. केंद्राच्या योजना थांबविण्याचे पाप उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली झाल्याचा आरोपही दरेकरांनी यावेळी केला.

त्याचबरोबर या निवडणुका जिंकणे ही कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. गावाला, तालुक्याला विकसित करण्याचे काम मुंबईच्या चाकरमान्यांनी केले आहे. उमेदवार हा महायुतीचा आहे, पंतप्रधान मोदींसाठी मतदान करणारा, देशाचे भविष्य घडविणारा उमेदवार आहे. या भावनेतून सर्वांनी ताकदीने काम केले पाहिजे, गावागावात जाऊन प्रचार केला पाहिजे. आपल्या विकासाची दारे उघडली आहेत. महायुतीच्या माध्यमातून राज्य सरकार काम करतेय. केंद्राचे पाठबळ पाहिजे तर छत्रपतींच्या आणि बाबासाहेबांच्या भूमीतून प्रचंड ताकदीने आपला खासदार गेला पाहिजे. भाजपाचे कार्यकर्तेही ताकदीने काम करणार आहेत. पंतप्रधान मोदींचे देशाला नेतृत्व हवेय त्यावेळेला भाजपाचा कार्यकर्ता कुठेही मागे राहणार नाही, असा विश्वासही दरेकरांनी व्यक्त केली.

Web Title: Mla pravin darekar should present to the people of raigad what big projects anant geet has brought through the centre mumbai maharashtra government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2024 | 03:18 PM

Topics:  

  • BJP
  • Eknath Shinde
  • Loksabha Elections
  • Maharashtra Government
  • MLA Pravin Darekar
  • Mumbai
  • political party
  • shivsena

संबंधित बातम्या

वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले
1

वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन
2

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
3

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

Mumbai Rain Update : मुंबई पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क रहावे, मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश
4

Mumbai Rain Update : मुंबई पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क रहावे, मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.