Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

१२ किल्ल्यांचा ‘युनेस्को’ मध्ये समावेश, राज ठाकरेंनी दिला इशारा – ‘ही गोष्ट हलक्यात घेतल्यास…’

महाराजांच्या 12 गडांना युनेस्कोचा दर्जा प्राप्त. राज ठाकरे म्हणाले की, सरकारने जागतिक वारसा दर्जा हलक्यात घेऊ नये कारण जर निकषांचे योग्य पालन केले नाही तर तो काढून घेतला जाऊ शकतो.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 12, 2025 | 04:40 PM
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा महाराष्ट्राला इशारा (फोटो सौजन्य - Facebook)

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा महाराष्ट्राला इशारा (फोटो सौजन्य - Facebook)

Follow Us
Follow Us:

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी १२ जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. त्यांनी म्हटले की, या ऐतिहासिक वास्तूंवरील सर्व अनधिकृत बांधकामे हटवली पाहिजेत, मग हे अतिक्रमण करणारे कोणत्याही समुदायाचे असोत. इतकंच नाही तर राज ठाकरे इशारा देत म्हणाले की, सरकारने जागतिक वारसा दर्जा हलक्यात घेऊ नये, कारण जर नियमांचे योग्य पालन केले नाही तर तो काढून घेतला जाऊ शकतो (फोटो सौजन्य – Facebook) 

जागतिक वारसा यादीत समाविष्ट हे किल्ले

मराठा शासकांच्या तटबंदी व्यवस्थेचे प्रतिनिधित्व करणारे ‘मराठा लष्करी भूदृश्य’ युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. पॅरिसमध्ये झालेल्या जागतिक वारसा समितीच्या (WHC) ४७ व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ‘मराठा लष्करी भूदृश्य’मध्ये महाराष्ट्रातील साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजय दुर्ग आणि सिंधुदुर्ग आणि तमिळनाडूतील गिंगी किल्ल्यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रासाठी गौरवाचा क्षण ! शिवरायांच्या 12 किल्यांचा UNESCO च्या जागतिक वारसा यादीत समावेश

अतिक्रमणं पाडा

मनसे प्रमुखांनी त्यांच्या फेसबुक हँडलवर लिहिले आहे की, “सरकारने अतिक्रमण करणाऱ्यांचा धर्म किंवा जात यांचा विचार न करता या किल्ल्यांवरील सर्व अनधिकृत बांधकामे ताबडतोब पाडावीत. या प्रसंगी महाराष्ट्राच्या कामगिरीबद्दल बोलणाऱ्यांना शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची कल्पना किती दूरवर पोहोचली होती हे लक्षात येईल आणि दोन भाषा आणि संस्कृतींमधील पूल किती जुना आणि मजबूत आहे हेदेखील त्यांना कळेल,”

‘आता किल्ल्यांवर योग्य लक्ष’

त्यांनी पुढे लिहिले आहे की, “युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिल्यानंतर, वास्तूंच्या संवर्धन आणि जीर्णोद्धारासाठी कठोर नियम आहेत ज्यांचे पालन करावे लागेल आणि आपल्या महाराजांच्या किल्ल्यांना ते योग्य लक्ष मिळेल.” याशिवाय आता किल्ल्यांकडे अधिक लक्षपूर्वक पहायला लागेल असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. 

‘मागील सरकारांनी जीर्ण अवस्थेत सोडले आहे’

त्यांनी असेही म्हटले आहे की, “या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी राज्य सरकार निधी मिळवेल आणि राज्याने स्वतःच्या खिशातूनही अधिक निधी वाटप करावा.” ठाकरे म्हणाले की, भूतकाळातील प्रत्येक सरकारने हे किल्ले जीर्ण अवस्थेत सोडले होते, ज्यामुळे जगाला त्यांना भेट देण्यासाठी आणि शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राचे वैभव दाखवण्यासाठी आमंत्रित करणे अशक्य झाले होते आणि सर्वात पोस्टच्या शेवटी त्यांनी सर्वांचे अभिनंदही केले आहे. युनेस्कोकडून मिळालेला हा दर्जा सांभाळण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे आणि शासनाने याकडे अधिक लक्ष द्यावे असंही त्यांच्या पोस्टमधून त्यांनी सांगितले असल्याचे दिसून आले. 

जागतिक वारसास्थळात कोल्हापूरच्या पन्हाळगडाचा समावेश; ‘युनेस्को’चे डॉ. जोशी म्हणाले…

राज ठाकरेंची पोस्ट 

Web Title: Mns leader raj thackeray reaction on chhatrapati shivaji maharaj forts in unesco world heritage list

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2025 | 04:40 PM

Topics:  

  • Marathi Batmya
  • MNS Chief Raj Thackeray
  • Mumbai News

संबंधित बातम्या

‘बीएलओ मशिदींमध्ये जाऊन एका विशिष्ट समाजातील…’; Mangal Prabhat Loadha यांची तक्रार
1

‘बीएलओ मशिदींमध्ये जाऊन एका विशिष्ट समाजातील…’; Mangal Prabhat Loadha यांची तक्रार

मान्सूनसाठी मुंबई मेट्रो प्रशासन सज्ज! सर्व मार्गांवर अतिरिक्त मेट्रो गाड्यांची व्यवस्था; उत्तम सेवा पुरवण्यासाठी व्यापक तयारी
2

मान्सूनसाठी मुंबई मेट्रो प्रशासन सज्ज! सर्व मार्गांवर अतिरिक्त मेट्रो गाड्यांची व्यवस्था; उत्तम सेवा पुरवण्यासाठी व्यापक तयारी

Robotic Knee Replacement: मुंबईत पहिल्यांदाच महापालिका रुग्णालयात मोफत रोबोटिक गुडघा प्रत्यारोपण; दोन शस्त्रक्रिया यशस्वी
3

Robotic Knee Replacement: मुंबईत पहिल्यांदाच महापालिका रुग्णालयात मोफत रोबोटिक गुडघा प्रत्यारोपण; दोन शस्त्रक्रिया यशस्वी

सानपाडा रेल्वेस्टेशन फुटपाथवरील अतिक्रमणाचा प्रश्न कायम; बीएमसीच्या कारवाईनंतरही पुन्हा उभे राहतात अनधिकृत हॉटेल्स आणि दुकाने
4

सानपाडा रेल्वेस्टेशन फुटपाथवरील अतिक्रमणाचा प्रश्न कायम; बीएमसीच्या कारवाईनंतरही पुन्हा उभे राहतात अनधिकृत हॉटेल्स आणि दुकाने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.