
मुंबईत उघड्यावर कचरा फेकलात तर खैर नाही! CCTVच्या निगराणीखाली दंडात्मक कारवाई
सातत्यपूर्ण देखरेखीवर भर
या अभियानाअंतर्गत मुंबईतील वारंवार कचरा साचणारी – ठिकाणे शोधून त्यांचे ‘गूगल मॅप’वर डिजिटल मंधिग करण्यात आले आहे. या ठिकाणांचे संरचित मूल्यमापन करून कवरा साचण्याची मूळ कारणे शोधणे, नागरिकांमध्ये जनजागृती करणे आणि सातत्यपूर्ण देखरेख टेकण्यावर पालिकेचा विशेष भर असेल, तसेच बाजारपेठा, मुख्य रस्ते, पदपथ, सार्वजनिक भूखंड, समुद्रकिनारे आणि नाल्याच्या परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. नाले व खाड्यांमधून समुद्रात प्लास्टिक कचरा जाण्यापासून रोखण्यासाठी आवश्यक ती नियंत्रणात्मक यंत्रणा अधिक मजबूत केली जाईल.
पदपथ नागरिकांसाठी चालण्यायोग्य करण्याचे निर्देश
दुसऱ्या बाजूला, मुंबईतील सुमारे ५० टक्के नागरिक चालत प्रवास करत असल्याने पदपत्रा मौकाळे ठेवण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. शाळा, रुग्णालये, रेल्वे व मेट्रो स्थानके तसेच बाजारपेठांच्या परिसरातील पदपथांवरील अनधिकृत फेरीवाले, अतिक्रमाने आणि चुकीचे रॅम्प तात्काळ हटवून पदयण नागरिकासाठी चालण्यायोग्य करण्याचे निर्देश सर्व सहायक आयुक्तांना देण्यात आले आहेत, जुनी ताबेदारी किया कर भरला तरी अनधिकृत बांधकामे अचिकृत होत नसल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट केल्यामुळे, अशा बांधकामांवर तातडीने निष्कासनाची कारवाई केली जाणार आहे.
एसटीतून प्रवास करताना सवलतीचा लाभ घेताय? तर आता तुमचंही होणार सर्वेक्षण
खड्ड्यांच्या तक्रारींचे ९६ टक्के यशस्वी निवारण
पालिकेच्या ‘मार्ग’ अॅपवर १० जून ते ३० जुलैदरम्यान आलेल्या खकुचाच्या तब्बल ९६ टक्के तक्रारीचे यशस्वी निवारण करण्यात आले असून, उर्वरित सर्व तक्रारीचेही गांभीर्याने आणि तात्काळ निरसन करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. कांजूरमार्ग कचरा प्रक्रिया प्रकल्पातील दुर्गंधी नियंत्रणात झालेल्या सुधारणाबद्दल उच्च न्यायालयाने पालिकेचे कौतुक केले असून, मुंबईला स्वच्छ आणि निरोगी बनवण्यासाठी नागरिक, रहिवासी संघटना व लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)