
mumbai (फोटो सौजन्य: social media)
नक्की प्रकरण काय ?
डोंबिवली मध्ये राहणाऱ्या श्रीनिवास कस्तुरी यांनी २३ जुलै २०२४ मध्ये घरून निघाले होते. त्यांची गाडी ही अटल सेतूवर बेवारस स्थितमध्ये आढळून आली होती. तपास केल्या नंतर लक्षात आल की त्यांनी उडी मारुन आत्महत्या केली आहे. घरातून ते बेपत्ता झाले होते. मात्र या घटनेला अडीच वर्ष होत आले तरी अजूनही दाखला मिळत नाही. दाखला मिळत नसल्याने त्यांची पत्नी ही वैतागून गेली होती. शेवटी तिने आता हाय कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर त्यांची पत्नी सुनयना यांनी एक अर्ज उरण पालिकेत दाखल केल होता. मात्र सुरुवातीला त्यांना उत्तर देण्यात आळ ते म्हणजे हे आमच्या हद्दीत येत नाही. शेवटी त्या नवी मुंबई पालिकेत गेल्या तिथून त्या पनवेल मध्ये पण गेल्या. मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आमच्या हद्दीत येत नाही म्हणून हात वर केले आणि याला जवळपास अडीच वर्ष गेली.
मृत्यूचा दाखल मिळत नाही माझी मोठी अडचण
त्यांनी हाय कोर्टात याचिका दाखल करत असताना त्यांनी जर मृत्यूचा दाखल मिळाला नाही तर कशी अडचण होत आहे. हे त्यात मांडलं आहे. माझी विमा आणि इतर सगळी काम ही अडकली आहेत. मला या सगळ्या गोष्टींचा त्रास होत आहे. माझ सगळं कुटुंब माझ्यावर आहे. माझी अडचण समुन घेवून मला न्याय द्या अशी मागणी आता तिने केली आहे.
Ans: अटल सेतूवर आत्महत्या झालेल्या व्यक्तीचा मृत्यू दाखला मिळालेला नाही.
Ans: उरण, नवी मुंबई आणि पनवेल यांच्यात हद्द वाद असल्याने प्रक्रिया अडली आहे.
Ans: मृत्यू दाखला मिळवण्यासाठी पत्नीने हायकोर्टात याचिका दाखल केली.