
करार रद्दचा परिणाम! मेट्रो एक्वा लाईनवर मोबाईल सेवा बंद, प्रवाशांची मोठी गैरसोय
मेट्रो तीन एक्वालाईन तीन टप्प्यांत सुरू करण्यात आली. यातील पहिला टप्पा आरे ते वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी), दुसरा टप्पा बीकेसी ते आचार्य अत्रे चौक वरळी आणि तिसरा टप्पा आचार्य अत्रे चौक ते कप परेड असा होता. यात आरे ते आचार्य अत्रे चौक वरळी पर्यंत प्रवाशांना मोबाईल नेटवर्कची सुविधा प्रदान करण्यात आली होती. सौदी अरेबियन फर्मची उपकंपनी असलेल्या ॲडव्हान्स्ड कम्युनिकेशन्स अँड इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम्स कंपनी इंडियाने (एसीईएस इंडिया) यांच्याकडून ही सुविधा दिली जात होती. अंदाजे सुमारे १२० कोटी रुपये खर्च करून भूमिगत दूरसंचार पायाभूत सुविधा उभारण्याचा करार नऊ वर्षांसाठी करण्यात आला होता. मात्र, आता हा संपूर्ण करार रद्द करण्यात आला आहे. करारानुसार, एसीईएस संपूर्ण पायाभूत सुविधा उभारणार होते. ज्याचा वापर स्थानिक सेल्युलर ऑपरेटर्सनी शुल्क भरल्यानंतर करायचा होता.
एसीईएस इंडियाचे कंपनीचे म्हणणे काय ?
एमएमआरसीएलने आम्हाला जुनी यंत्रणा काढून टाकण्यास सांगितले आहे. आता नवीन पायाभूत सुविधा उभारण्यासाठी काही महिने, किंबहुना काही वर्षे लागतील. पूर्णपणे कार्यरत असलेल्या मेट्रोमधील कामाचे मर्यादित तास आणि निर्बंधांमुळे परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दूरसंचार कंपन्यांनी एमएमआरसीएलला एक संयुक्त पत्र जारी करून एसीईएसला आपला पाठिंबा दर्शवला आहे. एसीईएसच्या कोणत्याही कृतीमुळे नव्हे, तर एमएमआरसीएलच्या सुधारित आरओडब्ल्यू नियमांनुसार जुळवून घेण्याच्या नकारामुळेच ही सहभागी होण्याची प्रक्रिया थांबली आहे.
भोंदूबाबा अशोक खरातवर उद्धव ठाकरेंकडून लाभाची खैरात; शेतकऱ्यांसाठीचे पाणी ‘शिवनिका’ संस्थेकडे वळवले
मेट्रो प्रशासनाची भूमिका काय ?
मेट्रो लाईन ३ वरील स्थानके आणि भुयारी मार्गात प्रवाशांना सध्या मोबाईल नेटवर्क कनेक्टिव्हिटीच्या समस्येचा सामना करावा लागत असल्याची आम्हाला जाणीव आहे. आपत्कालीन संपर्क सुविधांसह महत्त्वपूर्ण सुरक्षा प्रणाली सर्वकाळ पूर्णपणे कार्यरत आहे. लवकरात लवकर मोबाईल नेटवर्क सेवा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.