
मुंबईसह छोट्या शहरांनाही वाहतूककोंडीचा विळखा; गर्दीच्या वेळी वाहनांचा वेग १५ किमीपर्यंत घटला
बुलेट ट्रेनचा वेग वाढणार, देखभालीचीही जय्यत तयारी; 3 शहरांत उभारले जाणार अत्याधुनिक डेपो
केवळ रस्त्यांची लांबी नव्हे, रचनेला महत्त्व
शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी केवळ रस्त्यांची एकूण लांबी वाढविणे पुरेसे नसून रस्त्यांचे जाळे आणि त्याची रचना महत्वाची असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. हैदराबादमधील तब्बल ९५ टक्के रस्ते १० मीटरपेक्षा कमी रुंदीचे आहेत. कोलकात्यात हे प्रमाण ९४ टक्के, तर दिल्ली आणि चेन्नईमध्ये ९२ टक्के आहे. मुंबईमध्ये मात्र १० मीटरपेक्षा कमी रुंदीच्या रस्त्याचे प्रमाण ६४ टक्के आहे, चेन्नई, बंगळुरू आणि पुणे या शहरांमध्ये दुय्यम रस्त्यांचे जाळे एकूण रस्ते नेटवर्कच्या केवळ १० ते १५ टक्के आहे. त्यामुळे मुख्य रस्त्यांवर वाहतुकीचा मोठा भार येतो आणि पर्यायी मार्गाची कमतरता भासते.
मुंबईत वाहनांचा वेग प्रतितास १५ किमीपर्यंत खाली
वर्ल्ड रिसोर्सेस इर्नस्टट्यूट इंडियाच्या अभ्यासानुसार, दिल्लीमध्ये सामान्य परिस्थितीत सुमारे ४६ किमी प्रतितास असलेला वाहनांचा वेग पीक अवरमध्ये अवघ्या १९ किमी प्रतितासावर येतो. हैदराबाद आणि मुंबईत ४० किमी प्रतितासांवरून वेग १५ किमी प्रतितासापर्यंत घसरतो. बंगळुरूमध्ये ३८ वरून १३ किमी प्रतितास, तर कोलकात्यात २९ वरून ११ किमी प्रतितास अशी घट नोंदवण्यात आली आहे. इतर शहरांच्या तुलनेत मुंबईत मात्र वाहनांचा वेग दिवसभर तुलनेने स्थिर राहतो. त्रिशूरमध्ये प्रामुख्याने संध्याकाळच्या वेळी काही काळ वाहतूक मंदावते, तर इंदूरमध्ये दीर्घकाळ वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)