
ताप, डेंग्यू अन् लेप्टोची धास्ती! मुंबईत पावसाळी आजारांचा वाढता धोका; मान्सून ओपीडींमध्ये रुग्णांची गर्दी
भिवंडीत मोठी दुर्घटना; चार मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली, 7 जणांचा मृत्यू
मुंबईत पावसाचा जोर कायम असताना पावसाळी आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुंबई महापालिकेने सुरू केलेल्या मान्सून ओपीडींमध्ये रुग्णांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. ताप, अंगदुखी, सर्दी, खोकला, मलेरिया, डेंग्यू आणि लेप्टोस्पायरोसिसच्या संशयित लक्षणांसह नागरिक तपासणीसाठी रुग्णालयांकडे धाव घेत असल्याचे चित्र प्रमुख तसेच उपनगरीय रुग्णालयांमध्ये पाहायला मिळत आहे. या ओपीडींमधून पावसाळी आजारांचे लवकर निदान आणि तातडीने उपचार देण्यावर भर दिला जात आहे. सायन रुग्णालयातील मान्सून ओपीडीमध्ये सकाळपासूनच रुग्णांची ये-जा सुरू असल्याचे दिसून आले. ताप आणि व्हायरल संसर्गाच्या लक्षणांसह येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दररोज सरासरी १० ते १५ रुग्ण; आवश्यकतेनुसार उपचार
रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद इंगळे यांनी सांगितले की, १ जूनपासून दररोज सरासरी १० ते १५ रुग्ण मान्सून ओपीडीमध्ये येत आहेत. प्रत्येक रुग्णाची तपासणी करून आवश्यकतेनुसार रक्त तपासण्या आणि पुढील उपचार केले जात आहेत. तर कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयातही पावसाळी आजारांच्या तपासणीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय गुप्ता यांनी, आतापर्यंत सुमारे १८० रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. तपासणीत डेंग्यू किंवा लेप्टोस्पायरोसिसची लक्षणे आढळल्यास संबंधित रुग्णांना तातडीने दाखल करून उपचार सुरू केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर विलेपार्ले येथील कूपर रुग्णालयातील चित्र अधिक व्यस्त दिसून आले.
अतिरिक्त खाटांची व्यवस्था