भिवंडीत मोठी दुर्घटना; चार मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली
भिवंडी : भिवंडीत चार मजली इमारतीचा एक भाग अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असून, इतर अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. अपघातानंतर बचावकार्य सुरू करण्यात आले. एनडीआरएफच्या पथकांनी ढिगाऱ्याखालून एका महिलेला जिवंत बाहेर काढले. या महिलेला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. इमारतीत दुरुस्तीचे काम सुरू होते. किमान तीन ते चार कामगार आत अडकल्याची भीती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ३० जुलैच्या रात्री उशिरा इमारतीचा भाग कोसळल्याने इतर अनेक कामगार बाहेर पळून गेले. दुरुस्तीचे काम सुरू असल्याने, घटनेच्या वेळी इमारतीत कोणीही नव्हते.
भिवंडीतील नरपोली येथील भंडारी कंपाऊंडमधील गंगाराम वाडी परिसरातील चार मजली कोहिनूर अपार्टमेंट (बी-विंग) इमारतीचा एक मोठा भाग अचानक कोसळला. भिवंडी निझामपूर शहर महानगरपालिकेने (बीएनसीएमसी) ही इमारत आधीच धोकादायक घोषित केली होती. ढिगाऱ्याखाली चार ते पाच जण अडकल्याची भीती आहे. एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाची पथके मदत आणि बचाव कार्यासाठी घटनास्थळी दाखल झाली आहेत.
धोकादायक इमारत म्हणून आधीच जाहीर
भिवंडी महानगरपालिकेने या इमारतीचे वर्गीकरण ‘सी-श्रेणी’ म्हणजेच अत्यंत जीर्ण आणि धोकादायक असे केले होते. अनेक नोटिसा बजावण्यात आल्या आणि बहुतेक रहिवाशांना बाहेर काढण्यात आले. तथापि, तळमजल्यावर दुरुस्तीचे काम सुरू होते.
दुरुस्तीचे काम सुरु असताना अपघात
दुरुस्तीच्या कामादरम्यान काही खांब तुटले, ज्यामुळे इमारतीचा पाया आणखी कमकुवत झाला आणि इमारत कोसळली. प्राथमिक माहितीनुसार, अपघाताच्या वेळी पाच ते नऊ कामगार इमारतीत होते, त्यापैकी काही जण आपले सामान आणण्यासाठी बाहेर गेले होते. नेमकी संख्या अद्याप स्पष्ट झालेली नाही.
रात्रीच्या वेळी सुरु होते इमारतीचे काम
ढिगाऱ्याखाली गाडले गेलेले लोक हे मजूर आहेत, जे रात्रीच्या वेळी इमारतीत काम करत होते. इमारतीचा एक भाग अचानक कोसळल्याने ते ढिगाऱ्याखाली अडकले. घटनेनंतर लगेचच भिवंडी अग्निशमन दलाच्या जवानांनी बचावकार्य सुरू केले. एनडीआरएफची पथकेही बचावकार्यात सामील झाली असून, अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी ढिगारा हटवण्याकरिता अवजड यंत्रसामग्रीचा वापर केला जात आहे.






