
मोठी बातमी! मुंबईत १५ दिवस जमावबंदी लागू; २३ जुलै ते ६ ऑगस्टपर्यंत निर्बंध कायम; मोर्चे, सभा आणि जमावावर पोलिसांची नजर (फोटो सौजन्य-ChatGPT)
मुंबई शहरात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी २३ जुलै ते ६ ऑगस्ट या कालावधीत १५ दिवसांसाठी जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ नये तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मुंबई पोलिसांनी हे आदेश जारी केले आहेत.
या आदेशानुसार, विनापरवानगी मोठ्या संख्येने लोकांनी एकत्र येणे, मोर्चे, आंदोलन किंवा सार्वजनिक सभा घेण्यावर निर्बंध राहणार आहेत. संवेदनशील भागांमध्ये पोलीस बंदोबस्त वाढविण्यात येणार असून कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. नागरिकांनी पोलिसांच्या आदेशांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आगामी काळात विविध कार्यक्रम आणि सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर हे निर्बंध लागू करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
सीजेपीचा मोर्चा आता संसद भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत पोहोचला आहे. दिल्लीत कॉकरोच जनता पक्षाने (सीजेपी) आयोजित केलेले आंदोलन आता संसद परिसराच्या बाहेर पोहोचले आहे. परिस्थिती पाहता, संपूर्ण परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. संसद भवनाचे बाहेरील दरवाजे काही वेळापूर्वीच बंद करण्यात आले. सुरक्षेच्या कारणास्तव संसद परिसर आणि आसपासच्या भागातील इंटरनेट सेवा देखील तात्पुरती बंद करण्यात आली आहे. मोर्चादरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला, त्यानंतर पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला. जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधूरही सोडण्यात आला. संसद परिसराची सुरक्षा आणखी मजबूत करण्यासाठी, सीआयएसएफचे एक जलद प्रतिसाद पथक (QRT) देखील तैनात करण्यात आले आहे. संपूर्ण परिसरात सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर असून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे.