
Ritu Tawade Mumbai Mayor BJP gets a mayor in BMC after 44 years political News
मुंबई महापालिकेवर भाजप-शिंदे गटाच्या युतीने विजय मिळवला. महायुतीला मुंबईमध्ये बहुमत मिळाल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीला मुंबईकरांनी पाठिंबा दिला नाही. 25 वर्षानंतर उद्धव ठाकरे यांनी मुंबई पालिकेवरील सत्ता गेली. यानंतर महापौर भाजपचा होणार की शिंदे गटाचा यावरुन राजकारण सुरु झाले. मात्र महायुतीमध्ये भाजपच मोठा भाऊ असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. मुंबईमध्ये तब्बल 44 वर्षानंतर बीएमसीमध्ये भाजपचा महापौरांनी पदभार स्वीकारला आहे. यामुळे हा भाजपसाठी मोठा विजय मानला जात आहे.
हे देखील वाचा : मावळ तालुक्यात ७७.२५ टक्के विक्रमी मतदान; झेडपी–पंचायत समिती निवडणुकीत राजकारण शिगेला
ठाकरे गट आणि मनसे यांच्या युतीने मुंबई महापालिका महापौर पदासाठी आणि उपमहापौर पदासाठी कोणाचाही अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे रितू तावडे यांची बिनविरोध निवड झाली. याबाबत 11 जानेवारी रोजी बीएमसीमध्ये अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी रितू तावडे यांची उमेदवार म्हणून घोषणा केली होती. तर राहुल शेवाळे यांनी उपमहापौर पदासाठी संजय घाडी यांच्या नावाची घोषणा केली होती. रितू तावडे यांनी सूचक गणेश खणकर आणि अनुमोदक अमेय घोले यांच्या साक्षीने नामनिर्देश पत्र महापालिका सचिवांकडे दाखल केले होते.
हे देखील वाचा : ७/१२ आणि नकाशांचा होणार अचूक ताळमेळ; पोटहिस्सा मोजणीचा मोठा निर्णय
यापूर्वी मुंबई महापालिकेवर ठाकरे गटाची सत्ता होती. मात्र निवडणुकीमध्ये योग्य संख्याबळ न मिळाल्याने ठाकरे गटाला माघार घ्यावी लागली आहे. महापौर पदाच्या रिंगणात उमेदवार द्यायचा की नाही याबाबत मातोश्रीवर बैठक झाली होती. मात्र यामध्ये उमेदवार द्यायचा नाही असा निर्णय घेण्यात आला. यानंतर भाजपचा महापौर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबई महापालिकेमध्ये ठाकरे गट-मनसेच्या युतीला 71 जागा तर काँग्रेसने पाठिंबा दिला तर महाविकास आघाडीचे संख्याबळ95 पेक्षा अधिक झाले असते. मात्र याबाबत योग्य निर्णय न घेण्यात आल्यामुळे मुंबईमध्ये भाजपचा महापौर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.