नागपूर : हिवाळी अधिवेशनातील आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळं आज सूप वाजणार आहे. या हिवाळी अधिवेशनात अनेक मुद्दे गाजले. सीमावाद, सुशांत सिंग राजपूत, दिशा सालियान मृत्यू प्रकरण, एयू, ईएस, राहुल शेवाळे, मंत्र्यांचे घोटाळे इत्यादी अनेक मुद्यांवरुन विरोधक-सत्ताधारी आमनेसामने येत सूडाचे व कुरघोडीचे राजकारण केल्याचे पाहिले. विरोधक मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक असून, दररोज आंदोलन करताहेत, अनेक मुद्यांवरुन विरोधक-सत्ताधारी आक्रमक होत, आमनेसामने येताहेत. दरम्यान, अधिवेशनाच्य पहिल्या दिवसापासून विरोधक आक्रमक होत सरकारच्या विरोधात आंदोलन करताहेत. दरम्यान, आज शेवटच्या दिवशी मंत्री राजीनामा तसेच विधानसभा अध्यक्ष यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव तसेच नवीन बॉम्ब फुटण्याची शक्यता आहे.
[read_also content=”आज सूप वाजणार! अधिवेशनात दिवसभरात काय-काय घडामोडी घडणार? शेवटच्या दिवशी कोण बॉम्ब फोडणार? वाचा सविस्तर… https://www.navarashtra.com/maharashtra/what-will-happen-during-the-day-in-winter-assembly-session-today-who-will-explode-the-bomb-on-the-last-day-read-more-357963.html”]
दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. विधानसभा सचिव राजेंद्र भागवत यांच्याकडे मविआ नेत्यांनी याबाबतचं पत्र सोपावलं आहे. काँग्रेसचे आमदार सुनील केदार, शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू, सुरेश वरपुडकर, अनिल पाटील यांनी हे पत्र सचिवांकडे दिलं आहे. मविआने दिलेल्या पत्रावर महाविकास आघाडीच्या 39 आमदारांच्या स्वाक्षरी आहेत. सभागृहात विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलण्याची संधी दिली जात नसल्याने नार्वेकरांविरोधात हा अविश्वास प्रस्ताव देण्यात आला आहे.
अजित पवारांची स्वाक्षरी नाही
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. मविआने दिलेल्या पत्रावर महाविकास आघाडीच्या 39 आमदारांच्या स्वाक्षरी आहेत. मात्र या पत्रावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांची स्वाक्षरी नसल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांची स्वाक्षरी या पत्रावर असायला हवी होती, मात्र या पत्रावर स्वाक्षरी का नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे. मविआने जर प्रस्ताव दिला असला तरी भाजप आणि शिंदे गटाकडे बहुमत असल्याने हा प्रस्ताव नामंजूर होण्याचीच शक्यता अधिक आहे. तर विधानसभा सचिव या प्रस्तावावर काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.