
फोटो सौजन्य AI
मात्र, मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास अचानक मुलाला क्लोरीनचा वास येऊ लागला. त्याला डोळ्यात जळजळ, श्वास घ्यायला त्रास व उलट्या होऊ लागल्या. त्याने सर्वांना झोपेतून उठविले. लगेच काही वेळात आजूबाजूला आरडाओरड सुरू झाल्याचा आवाज आला. आम्ही लगेच दारे-खिडक्या बंद केल्या व तेवढ्या रात्री मुख्य दाराला कुलूप लावून सुरक्षित स्थळी गेलो .
जवळपास कुणीही नातेवाईक नसल्यामुळे नातवासह आम्ही सर्वांनी उघड्यावर रस्त्यावरच रात्र जागून काढली. मला आधीच किडनीचा त्रास आहे. त्यात दम कोंडल्यासारखे वाटल्याने जीव घाबरत होता. सोमवारी दुपारी ११.३० च्या सुमारास परिस्थिती साधारण
झाल्यानंतर आम्ही सर्व जण घरी परतलो. परंतु, अद्यापही त्रास सुरूच आहे’ असे भट यांनी सांगितले.
Nagpur News : स्फोटकांनी भरलेल्या व्हॅनला लागली आग;मोठा अनर्थ टळला
भोपाळमध्ये काही दशकांपूर्वी झालेल्या विषारी वायुगळतीने अनेकांचे जीव गेले, गोधनीत झालेल्या या घटनेनंतरही अनेकांना भोपाळ वायुगळतीची आठवण झाली. मात्र, गोधनीतील घटना ही कमी तिव्रतेची व तातडीने सुरक्षात्मक उपाययोजना करण्यात आल्याने नियंत्रणात राहीली, वेळीच पाण्याचा मारा शिवाय निसर्गानेही पावसाच्या रूपात मदत केल्याने वायुगळती वैगात पसरण्यावर मयाँदा आल्या.
या लेआऊटमधील अनेकांना झाला. सरस्वती सरोदे यांनीही घडलेल्या घटनेबाबत माहिती दिली, त्या म्हणाल्या, मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास श्वसनाचा त्रास व डोळ्यात मिरची गेल्याप्रमाणे वाटू लागल्याने घरातील सर्व जण गोधनी रोडकडे पळत सुटलो. रस्त्यावर दोन-तीन तास काढल्यानंतर प्रभाव कमी झाल्यानंतर पहाटे साडेचार वाजता घरी परतलो.
वायूगळतीमुळे फागोजी ले-आऊट परिसरात राहणाऱ्या राजू ढोणे यांना चांगलाच फटका बसला. या दुर्घटनेत त्याचा लाडका ‘रुबी’ नावाचा पांढऱ्या रंगाचा पाळीव कुत्रा मरण पावला. घरातील अन्य सदस्यांना वेळीच रुग्णालयात भरती करण्यात आले.
परिसरातील सुरेश सूर्यवंशी, आकाश कोलते, कार्तिक लक्षणे, गौरव लक्षणे, महेश यादव, स्वराज येलेकर व परिसरातील अन्य तरुणांनी धाडस व तत्परता दाखवून झोपेत असलेल्या फागोजी ले-आऊट व आजूबाजूच्या असंख्य नागरिकांना खासगी वाहनांनी सुरक्षितस्थळी हलविले, तसेच गंभीर अवस्थेत असलेल्यांना जवळच्या खासगी रुग्णालयांमध्ये भरती केले. त्यांच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या तरूणांनी वेळीच नागरिकांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला, घर व सामानाची चिंता करू नका, आधी जीव महत्वाचा असल्याचे सांगत धीर दिला.