
फोटो सौजन्य AI
महापौर निता ठाकरे यांनी यशाचे श्रेय कुशल नेतृत्वाला देत सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शन आणि नेतृत्वात शहर सातत्याने विकासाच्या दिशेने पुढे जात आहे. शहरवासीयांचे आरोग्य आणि स्वच्छ हवा निश्चित करणे हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे.
Nagpur News : पश्चिम नागपुरात DJच्या सुरांचा सवाल; यंदा DJ वाजणार की बंदी कायम?
शहरात प्रदूषण रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यावरणपूरक ई-बसेस चालवल्या जात आहेत. ज्यांचा वायू प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यात मोठा वाटा राहिला आहे. शहराला हिरवेगार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू केला आहे.
ज्याचे दूरगामी आणि सकारात्मक परिणाम येणाऱ्या वर्षात दिसून येतील. क्लीन एअर अॅक्शन प्लॅनअंतर्गत प्रदूषण नियंत्रणाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले आणि यामध्ये नागरिकांचे भरपूर सहकार्य मिळाले.
मनपा आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांनी या यशास प्रशासन आणि नागरिकांच्या सामूहिक प्रयत्नांचा परिणाम असल्याचे सांगितले, महानगरपालिकेचा ‘क्लीन एअर अॅक्शन प्लॅन’ जमिनी स्तरावर अत्यंत प्रभावीपणे राबवला जात आहे, असेही ते म्हाणाले.
Nagpur News : सभापतींच्या वाहनावर ‘महाराष्ट्र सरकार’चा फलक; GADची कारवाई
राष्ट्रीय स्तरावरील या क्रमवारीत टॉप-१०मध्ये स्थान मिळणे ही नागपूरसाठी महत्त्वाची उपलब्धी मानली जात आहे. महाराष्ट्रातील शहरांमध्येही नागपूरने तिसरे स्थान मिळवत आपली कामगिरी अधोरेखित केली आहे.
स्वच्छ हवा ही केवळ पर्यावरणाशी संबंधित बाब नसून नागरिकांच्या आरोग्याशीही थेट जोडलेली आहे. त्यामुळे या क्रमवारीमुळे नागपूरच्या प्रदूषण नियंत्रणाच्या प्रयत्नांना प्रोत्साहन मिळणार आहे. मात्र, शहराचा क्रमांक सुधारण्यासाठी वाहनांचे उत्सर्जन, बांधकामाची धूळ आणि वाढती वाहतूक यांसारख्या समस्यांवर आणखी प्रभावीपणे काम करण्याची गरज आहे.