
फोटो सौजन्य सोशल मीडिया
स्वातंत्र्यदिनानिमित्त शनिवारी सकाळी पोलिस आयुक्तालयात आयोजित कार्यक्रमात झोल सहभागी झाले होते. कार्यक्रमानंतर त्यांनी सहकारी अधिकारी आणि मित्रांसोबत काही वेळ निवांत गप्पा मारल्या. उपनिरीक्षक अंकुश राठोड यांच्यासह अनेक सहकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी आरोग्याची काळजी घ्या, अनावश्यक ताण टाळा,असा सल्लाही त्यांनी सहकाऱ्यांना दिला. गप्पा आटोपल्यानंतर ‘उद्या निवांत भेटू’ असे म्हणत ते घरी परतले. मात्र, त्यांच्या आयुष्यात तो ‘उद्या’ कधीच उजाडला नाही. रविवारी मध्यरात्री त्यांच्या निधनाची बातमी पोलिस सहकाऱ्यांपर्यंत पोहोचली आणि सर्वांनाच मोठा धक्का बसला.
Nagpur News : वैदर्भीवादी मुंबईत देणार धडक ;१८ व १९ ला आझाद मैदानात करणार आंदोलन !
शनिवारी कार्यालयातील कार्यक्रमानंतर झोल यांनी कुटुंबासोबत वेळ घालवला. पत्नी आणि मुलांना बाहेर फिरायला घेऊन गेल्यानंतर ते सायंकाळी घरी परतले होते. त्यानंतर घरात काही कारणावरून बाद झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
रात्री उशिरा त्यांनी गळफास घेतल्याचे सांगितले जाते. पत्नीच्या लक्षात येताच आरडाओरड झाली. शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांना तत्काळ मेयो रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर त्यांचे पार्थिव मूळ गावी जालना येथे रवाना केले.
सेवेत असलेल्या अधिकाऱ्याच्या अशा आकस्मिक निधनामुळे पोलिस दलात विविध प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यांच्या मृत्यूमागे कौटुंबिक, वैयक्तिक अथवा अन्य कोणते कारण होते का, याचा पोलिस तपास करीत आहे. घटनेपूर्वी ते कोणाच्या संपर्कात होते.
त्यांच्या मानसिक स्थितीबाबत काही संकेत मिळतात का यासह विविध बाबींची चौकशी केली जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पुरावे संकलित केले आहेत. आत्महत्येची कारणे आणि घटनेची नेमकी पार्श्वभूमी तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
Nagpur News : पावभाजी दिली नाही म्हणून कटरने हल्ला ; गळ्यावरचा वार गालावर बसला !
ज्ञानेश्वर झोल यांच्या निधनाची बातमी समजताच नागपूर पोलिस आयुक्तालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला. कर्तव्याप्रती निष्ठावान, सहका-यांशी मनमोकळेपणाने वागणारे आणि प्रत्येकाशी आपुलकीने संवाद साधणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. काही तासांपूर्वीच ज्यांच्यासोबत हसत-खेळत गप्पा मारल्या, त्यांचाच निरोप घ्यावा लागल्याने अनेक सहकारी भावूक झाले.
पोलिस आयुक्तालयातर्फे त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली, त्यांच्या पश्चात पत्नी, जुळी मुले आणि कुटुंबीय असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने एका कुटुंबाचा आधारच नव्हे, तर पोलिस दलातील एका जिवलग सहका-याचीही कायमची उणीव निर्माण झाली आहे.