Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दाऊदसोबत संबंध असलेल्या महिलेला राहुल शेवाळे पैसे पुरवतात, ठाकरे गटाच्या नेत्याने केली ही मागणी

रिया चक्रवतीनेच एयूचा खुलासा केला आहे. त्यामुळे कांगावा करणाऱ्यांचं कानफाड फुटलं आहे. अशा लोकांना मी कवडीची किंमत देत नाही असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत, असंही त्यांनी सांगितलं. नारायण राणे यांनी केलेल्या टीकेचाही त्यांनी समाचार घेतला.

  • By Sunil Chavan
Updated On: Dec 26, 2022 | 03:21 PM
दाऊदसोबत संबंध असलेल्या महिलेला राहुल शेवाळे पैसे पुरवतात, ठाकरे गटाच्या नेत्याने केली ही मागणी
Follow Us
Close
Follow Us:

नागपूर:  दाऊद आणि पाकिस्तानातील एका गँगशी संबंध असलेल्या महिलेला युवासेनेकडून बळ दिलं जात असल्याचा आरोपही शेवाळे यांनी केला आहे. शेवाळे यांच्या या आरोपावर ठाकरे गटाचे नेते, आमदार भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दाऊदसोबत संबंध असलेल्या महिलेला राहुल शेवाळे पैसे पुरवत आहेत. त्यामुळे शेवाळे यांची अटक करा, अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली आहे.

भास्कर जाधव यांनी यावेळी राज्य सरकारवरही टीका केली. सरकारमध्ये ताळमेळ नाही. या सरकारमध्ये कमी आमदार असलेले मुख्यमंत्री आहेत आणि जास्त आमदार असलेले उपमुख्यमंत्री आहेत. हे सरकार म्हणजे बोलाचा भात अन् बोलाचीच कढी आहे. भाजप सारखे निर्लज्ज लोक पाहिले नाहीत, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली.

रिया चक्रवतीनेच एयूचा खुलासा केला आहे. त्यामुळे कांगावा करणाऱ्यांचं कानफाड फुटलं आहे. अशा लोकांना मी कवडीची किंमत देत नाही असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत, असंही त्यांनी सांगितलं. नारायण राणे यांनी केलेल्या टीकेचाही त्यांनी समाचार घेतला. राणेंची राज्यसभेची टर्म संपत आलीय का हे बघावं लागेल. राणेंचं कर्तृत्व शून्य आहे. कुणाला तरी खूश करण्याकरिता राणे पूर्वीच्या नेत्यांवर टीका करतात. त्या पक्षात जायचं आणि पदं मिळवायचं ही त्यांची खासियत आहे.

त्यांना काहीच किंमत नाही. राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी ठाकरे घराण्यावर टीका करत असतात. टीका केल्याशिवाय कोणी किंमत देणार नाही, महत्त्व देणार नाही हे त्यांना माहीत आहे, अशी टीका त्यांनी केली. एक काळ होता. महाराष्ट्र दिल्लीपुढे झुकत नव्हता. पण आज सकाळ संध्याकाळ महाराष्ट्र दिल्लीपुढे झुकत आहे. पर्यायाने गुडघे टेकत आहे. हे चित्रं स्पष्ट झालं आहे. राज्यपालांनी महापुरुषांचा अपमान करूनही केंद्र सरकार त्यांना हटवत नाही. राज्यपालांनी महापुरुषांचा अपमान करावा, महाराष्ट्राचा अपमान करावा ही रणनीती दिसत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

Web Title: Rahul shewale provides money to a woman who is in a relationship with dawood the leader of the thackeray group demanded

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 26, 2022 | 03:21 PM

Topics:  

  • BJP
  • Nationalist Congress Party
  • rahul shewale
  • shivsena
  • Thackeray Group

संबंधित बातम्या

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू
1

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
2

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
3

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ
4

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.