Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक! 5 महिन्यांत आढळले 16 अनोळखी मृतदेह, पोलिसांसमोर आव्हान

गोंदिया जिल्ह्यात चालू वर्षात अद्यापपर्यंत 16 बेवारस मृतदेह आढळले आहेत. त्यापैकी बहुतांश मृतदेह हे उड्डाण पुलाखाली, रेल्वे रुळावर आढळले असून, बहुतांश मृतदेहांची ओळख पटलेली नाही. या प्रकरणांचा तपास करण्यात पोलिस यंत्रणेच्

  • By संदीप गावडे
Updated On: Jun 12, 2025 | 01:24 AM
धक्कादायक! 5 महिन्यांत आढळले 16 अनोळखी मृतदेह, पोलिसांसमोर आव्हान

धक्कादायक! 5 महिन्यांत आढळले 16 अनोळखी मृतदेह, पोलिसांसमोर आव्हान

Follow Us
Follow Us:

गुन्ह्यांच्या तपासापेक्षा आता बेवारस मृतदेहांची ओळख पटविण्यातच पोलिसांचा अधिक कस लागत आहे. रेल्वे रुळावर, जंगलात अनेक मृतदेह आढळून येत असून, ते कुजलेल्या अवस्थेत असतात. अशावेळी चेहरापट्टीच स्पष्ट नसताना मृत पावलेली व्यक्ती कोण ? याचे कोडे उलगडण्यासाठी तपास यंत्रणांची कसोटी लागत आहे. गोंदिया जिल्ह्यात चालू वर्षात अद्यापपर्यंत 16 बेवारस मृतदेह आढळले आहेत. त्यापैकी बहुतांश मृतदेह हे उड्डाण पुलाखाली, रेल्वे रुळावर आढळले असून, बहुतांश मृतदेहांची ओळख पटलेली नाही. या प्रकरणांचा तपास करण्यात पोलिस यंत्रणेच्या नाकीनऊ येत आहे.

Vaishnavi Hagavane Case: वैष्णवी मृत्यू प्रकरण; निलेश चव्हाणच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने दिला ‘हा’ निर्णय

बेपत्ता झालेल्या लोकांचे मृतदेह रस्त्याच्या कडेला, जंगलात, नदी-नाल्यात आढळतात. बेपता व्यक्तीचे मृतदेह जरी आढळले तरी त्याचा अपघात की घातपात ? या दिशेने पोलिसांना तपास करावा लागतो. त्या व्यक्तीची पार्श्वभूमी आणि परिस्थिती पाहून तपास केला जातो. जराशी चूक मृतदेहाच्या अदलाबदलीला कारणीभूत ठरू शकते. यामुळे बेपत्ता व्यक्तींची माहिती जुळवाजुळव करण्यासह नातेवाइकांकडून त्याची ओळख पटवली जाते. अशावेळी अंगावरील कपडे, दागिने, गोंदण हे देखील पोलिसांना दिशा देतात. काही प्रकरणांत अशा मृतदेहांवरून हत्येचे गुन्हे देखील पोलिसांनी उघड केले आहेत. तर काही प्रकरणात मृत्यूचे कारण स्पष्टच होत नाही.

अनोळखी मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करणे, हे माणुसकीचे व पुण्याचे कार्य मानले जाते. त्यामुळे पूर्वी काही पोलिस हे स्वखर्चाने कापड, साहित्य आदी लागणारा खर्च स्वतःच्या खिशातून करायचे. परंतु आता शासनाकडून बेवारस मृतदेहाच्या विल्हेवाटीसाठी सुमारे दोन हजार रुपयांपर्यंत निधी मिळतो. शासकीय शवागारात मृतदेह मोफत ठेवला जातो तसेच नगरपरिषद स्मशानभूमीत अंत्यविधी मोफत केला जातो. अनोळखी मृतदेह सापडल्यावर स्थानिक पोलिस पंचनामा करून मृतदेह शवागारात ठेवतात. शवविच्छेदन केले जाते व मृतदेहाची ओळख पटून त्याचे वारस येईपर्यंत 7 ते 15 दिवस मृतदेह शवागारातच ठेवला जातो. अनेक वेळा मृतदेहाची ओळख पटली तरी त्यांचे वारस सापडत नाहीत वा येत नाहीत. जिल्ह्यात जानेवारी ते मे 2025 या 5 महिन्यांच्या काळात ठिकठिकाणी विविध घटनांत 16 बेवारस मृतदेह पोलिसांना आढळले. मात्र त्यांची ओळख अद्यापही पटविण्यात पोलिस यंत्रणेला यश आले नाही. ओळख पटली नसल्याने त्या घटनांचा तपास देखील रखडला आहे.

अनोळखी मृतदेह आढळल्यास त्याची ओळख पटून त्याचे वारस मिळावेत, यासाठी संबंधित पोलिस तपास करतात. वारस मिळून आल्यास मृतदेह त्यांच्या ताब्यात दिला जातो. मृत व्यक्तीच्या नातेवाइकांची 10 ते 15 दिवस वाट पाहिली जाते. कोणी वारस सापडला नाही तर पोलिस अनोळखी मृतदेहाचे योग्य पद्धतीने अंत्यसंस्कार करतात.
किशोर पर्वते, पोलिस निरीक्षक, गोंदिया

कडकडणाऱ्या विजांचा प्रकाश अन् गुन्हेगाराचा शोध..! भारती विद्यापीठ पोलिसांनी लावला ‘त्या’ खूनाचा छडा

मृतदेहांना मिळतो शवागाराचा आधार

शासकीय शवागारामध्ये अनोळखी मृतदेह 7 दिवसांसाठी ठेवला जातो. त्यादरम्यान ओळख पटून अनोळखी मृत व्यक्तीचे परिचित आले तर ठीक, अन्यथा पोलिसांना मृतदेह योग्य विल्हेवाट लावण्यासाठी घेऊन जाण्यास सांगितले जाते. अनोळखी मृतदेहाची ओळख पटण्याची शक्यता पोलिसांना वाटली तर त्यांच्या सूचनेनुसार आणखी सात दिवसांची मुदत वाढवली जाते. 15 दिवसांनी शवागार विभाग पोलिसांना पुन्हा पत्र देते.

Web Title: Shocking 16 unidentified bodies found in 5 months police face challenge identifying them

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2025 | 11:22 PM

Topics:  

  • crime news
  • gondia news
  • Nagpur Crime News

संबंधित बातम्या

‘डिजिटल ॲरेस्ट’ची भीती दाखवून ज्येष्ठाची फसवणूक; तब्बल ‘इतक्या’ लाखांना घातला गंडा
1

‘डिजिटल ॲरेस्ट’ची भीती दाखवून ज्येष्ठाची फसवणूक; तब्बल ‘इतक्या’ लाखांना घातला गंडा

महिलेचा छळ करण्यासाठी तिचा ई-मेल आयडी टाकला पॉर्न साईटवर! मग अटक झाल्यावर जामीन मागण्यासाठी गेला अन्‌ न्यायाधीशांनी थेट…
2

महिलेचा छळ करण्यासाठी तिचा ई-मेल आयडी टाकला पॉर्न साईटवर! मग अटक झाल्यावर जामीन मागण्यासाठी गेला अन्‌ न्यायाधीशांनी थेट…

वारी सोहळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ, कडेकोट बंदोबस्तातही 11 साखळी चोरी; हडपसरमध्येच 9 घटना
3

वारी सोहळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ, कडेकोट बंदोबस्तातही 11 साखळी चोरी; हडपसरमध्येच 9 घटना

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी मोठी माहिती समोर; सिया आणि चेतन निर्दोष सुटणार?
4

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी मोठी माहिती समोर; सिया आणि चेतन निर्दोष सुटणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.