
नाशिक-मुंबई महामार्गावरील हॉटेल्समधून पनीर गायब; बोगस पनीरच्या चर्चेने खवय्ये सावध
Nashik Crime: लग्नासाठी हट्ट धरला, कुटुंबीयांनी होकार दिला अन् दुसऱ्याच दिवशी प्रियकराचा खून
काही व्यापारी आणि हॉटेल व्यावसायिकांना अत्यंत कमी दरात या पनीरचा पुरवठा केला जात असल्याची माहिती समोर आली होती, मात्र, ही बाब चव्हाट्यावर येताच अनेक ठिकाणच्या खानावळी आणि ढाब्यांवरून पनीरचे पदार्थ मिळणे बंद झाले आहे. पनीर बटर मसाला, कढ़ाई पनीर, पनीर टिक्का यांसारख्या लोकप्रिय पदार्थाची मागणी करणाऱ्या ग्राहकांना पनीर उपलब्ध नाही, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आतापर्यंत आपण नेमके काय खात होतो? असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
शहरासह संपूर्ण तालुक्यात दररोज क्विंटलच्या पटीत पनीरची विक्री होते. मात्र, या पनीरचा मुख्य पुरवठादार कोण? त्याची गुणवता तपासली जाते का ? उत्पादकांकडे अन्न सुरक्षा विभागाचे परवाने आहेत का? याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. जर बाजारात खरोखरच दर्जेदार पनीर येत होते, तर अचानक हा तुटवडा का निर्माण झाला? की कारवाईच्या भीतीने बोगस पनीरचे कारखाने भूमिगत झाले आहेत? अशा अनेक प्रश्नांमुळे या प्रकरणातील संशय अधिक गडद झाला आहे. इतकी मोठी चर्चा आणि ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला असतानाही, अन्न व औषध प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस पावले उचलली गेलेली नाहीत. संशयास्पद कारखान्यांवर छापे टाकणे, पनीरचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवणे किंवा विक्रेत्यांची चौकशी करणे, अशी कोणतीही मोठी मोहीम तालुक्यात राबवली नसल्याचे दिसते आहे.