Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Unseasonal Rain: शेतकरी हवालदिल! अवकाळीमुळे ५५ हजार हेक्टरवर पिकांचे नुकसान, ३० हजारांहून अधिक बाधित

अवकाळी पावसामुळे ५५ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून ३० हजारांहून अधिक शेतकरी बाधित झाले आहेत. पावसामुळे हाताशी आलेली पिके मातीमोल झाली असून शेतकरी हवालदिल झाले आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 01, 2026 | 01:01 PM
धक्कादायक ! तीन महिन्यांत तब्बल 217 शेतकऱ्यांची आत्महत्या; काँग्रेसने साधला सरकारवर निशाणा

धक्कादायक ! तीन महिन्यांत तब्बल 217 शेतकऱ्यांची आत्महत्या; काँग्रेसने साधला सरकारवर निशाणा

Follow Us
Follow Us:
  • अवकाळीमुळे ५५ हजार हेक्टरवर पिकांचे नुकसान
  • ३० हजारांहून अधिक बाधित
  • पावसामुळे हाताशी आलेली पिके मातीमोल
नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा कहर केला असून मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील १५४ गावांमधील तब्बल ३० हजार ५३ शेतकऱ्यांच्या सुमारे २२ हजार २७ हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली आहेत. गारपीट आणि वादळी वाऱ्यांसह झालेल्या पावसामुळे हाताशी आलेली पिके मातीमोल झाली असून शेतकरी हवालदिल झाले आहेत.

Ashok Kharat Case : अशोक खरातची पत्नी फरार तर मुलगा हर्षवर्धन अटकेत; ‘या’प्रकरणी पोलिसांकडून कारवाई

यापूर्वीही मार्च महिन्यात १८ मार्च रोजी २७० हेक्टर तर २९ मार्च रोजी ४८२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. सततच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून उभ्या पिकांसह काढणीस आलेल्या पिकांनाही मोठा फटका बसला आहे. मालेगाव, सटाणा, देवळा, नाशिक, निफाड, सिन्नर आणि चांदवड या तालुक्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे. विशेषता सटाणा तालुक्यात अवकाळी पावसाने सर्वाधिक कहर केला असून मोठ्या क्षेत्रावरील पिके बाधित झाली आहेत. जिल्ह्यातील इतर काही तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी असल्याने तेथील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सततच्या अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील शेती मोठ्या संकटात सापडली असून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने मदत व पंचनाम्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कांदा व डाळिंबाला सर्वाधिक फटका

अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका कांदा आणि डाळीय या पिकाना बसला आहे. 18 हजार 119 हेक्टरवरील कांदा पिके बाधित 1,858 हेक्टरवरील डाळींब फळबागांचे नुकसान गारपीट व पावसामुळे कांद्याची गुणवत्ता खालावण्याची शक्यता असून साठवणुकीवरही परिणाम होणार आहे. डाळीच फळबागांमध्ये फळगळ व रोगराई वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.

चार दिवस सतर्कतेचे

जिल्ह्यात आधीच मोठे नुकसान झालेले असताना ४ एप्रिलपर्यंत यलो अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून शेतक-यांनी पिकांचे संरक्षण करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

प्रशासनाचा सल्ला

काढणी केलेले उत्पादन सुरक्षित ठिकाणी साठवाये, शेतातील पिके ताडपत्रीने झाकून ठेवावीत, पाण्याचा निचरा व्यवस्थित करावा, हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेती कामांचे नियोजन करावे, वादळी वाऱ्यापासून फळबागांचे संरक्षण करावे.

Nashik News : उष्माघाताचा कहर; दररोज ८० कोंबड्यांचा मृत्यू, पोल्ट्री व्यवसायाला मोठा फटका

Web Title: Unseasonal rain crop loss 55 thousand hectare 30 thousand farmers affected

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 01:01 PM

Topics:  

  • Farmers
  • maharashtra
  • Unseasonal Rain

संबंधित बातम्या

Konkan Railway News: कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले! कोकणकन्या ५ तास ४० मिनिटे, मांडवी ६ तास उशिराने
1

Konkan Railway News: कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले! कोकणकन्या ५ तास ४० मिनिटे, मांडवी ६ तास उशिराने

Monsoon Trip : जिथे ढग डोंगररांगांच्या कुशीत विसावतात… पावसाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील 6 अप्रतिम ठिकाणे
2

Monsoon Trip : जिथे ढग डोंगररांगांच्या कुशीत विसावतात… पावसाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील 6 अप्रतिम ठिकाणे

Purandar Airport : पुरंदर विमानतळ प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना विकसित 10 टक्के भूखंड देणार; जिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण
3

Purandar Airport : पुरंदर विमानतळ प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना विकसित 10 टक्के भूखंड देणार; जिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण

पैठणी साडी आणि ‘मोर’ यांचे अतूट नाते काय? जाणून घ्या पैठणीचा राजेशाही इतिहास आणि पदरावरील नक्षीमागील रहस्य!
4

पैठणी साडी आणि ‘मोर’ यांचे अतूट नाते काय? जाणून घ्या पैठणीचा राजेशाही इतिहास आणि पदरावरील नक्षीमागील रहस्य!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.