
शेतकरी हवालदिल! अवकाळीमुळे ५५ हजार हेक्टरवर पिकांचे नुकसान, ३० हजारांहून अधिक बाधित (फोटो सौजन्य-Gemini)
यापूर्वीही मार्च महिन्यात १८ मार्च रोजी २७० हेक्टर तर २९ मार्च रोजी ४८२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. सततच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून उभ्या पिकांसह काढणीस आलेल्या पिकांनाही मोठा फटका बसला आहे. मालेगाव, सटाणा, देवळा, नाशिक, निफाड, सिन्नर आणि चांदवड या तालुक्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे. विशेषता सटाणा तालुक्यात अवकाळी पावसाने सर्वाधिक कहर केला असून मोठ्या क्षेत्रावरील पिके बाधित झाली आहेत. जिल्ह्यातील इतर काही तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी असल्याने तेथील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सततच्या अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील शेती मोठ्या संकटात सापडली असून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने मदत व पंचनाम्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका कांदा आणि डाळीय या पिकाना बसला आहे. 18 हजार 119 हेक्टरवरील कांदा पिके बाधित 1,858 हेक्टरवरील डाळींब फळबागांचे नुकसान गारपीट व पावसामुळे कांद्याची गुणवत्ता खालावण्याची शक्यता असून साठवणुकीवरही परिणाम होणार आहे. डाळीच फळबागांमध्ये फळगळ व रोगराई वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.
जिल्ह्यात आधीच मोठे नुकसान झालेले असताना ४ एप्रिलपर्यंत यलो अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून शेतक-यांनी पिकांचे संरक्षण करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
काढणी केलेले उत्पादन सुरक्षित ठिकाणी साठवाये, शेतातील पिके ताडपत्रीने झाकून ठेवावीत, पाण्याचा निचरा व्यवस्थित करावा, हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेती कामांचे नियोजन करावे, वादळी वाऱ्यापासून फळबागांचे संरक्षण करावे.