या ठिकाणी नवीन पुलाचे काम सुरू असून, वळणाजवळ रस्त्यावर पडलेली रेती आणि अपुरी सुरक्षितता यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटले. अपघातातील कार ही रोशन अनुराग पियुष डुंगडुंग (वय 33, रा. सीबीडी बेलापूर) चालवत होता. भरधाव वेग आणि रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्यामुळे वाहन डिव्हायडरवर चढून पलटी झाले.या अपघातात साक्ष भाटिया (वय 29) यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्या ओठाला मार लागून जखम झाली आहे तसेच डोळ्याला सूज आली आहे. तर आकाशदीप मिंझ (वय 31) यांना किरकोळ दुखापत झाली आहे.
राज्यातील 364 पोलिसांना मिळणार बढती; सहाय्यक पोलिस निरीक्षक आता होणार पोलिस निरीक्षक
‘रेस ट्रॅक’ची भीती ठरली खरी
विशेष म्हणजे, ‘नवराष्ट्र’च्या रायगड आवृत्तीमध्ये याच एअरपोर्ट लिंक रोडबाबत धोक्याचा इशारा देण्यात आला होता.“करंजाडे-उलवे अॅक्सेस रोड बनतोय रेस ट्रॅक; अपघातांची भीती तीव्र” या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या वृत्तात वाहनचालकांचा बेफाम वेग, अपुऱ्या सुरक्षा उपाययोजना, वळणावरील धोका आणि रस्त्यावर पडलेले बांधकाम साहित्य यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.आता घडलेल्या या अपघातामुळे त्या इशाऱ्याची प्रचिती आली असून प्रशासनाच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
“मोठा अपघात झाल्यावरच प्रशासन जागे होणार का?”
सीसीटीव्ही कॅमेरे, स्पीड ब्रेकर, वेगमर्यादा फलक आणि पोलिस पेट्रोलिंग वाढवण्याची मागणी आता जोर धरत आहे.
या ठिकाणी नवीन पुलाचे काम सुरू असून, वळणाजवळ रस्त्यावर पडलेली रेती आणि अपुरी सुरक्षितता यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटले. अपघातातील कार ही रोशन अनुराग पियुष डुंगडुंग (वय 33, रा. सीबीडी बेलापूर) चालवत होता. भरधाव वेग आणि रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्यामुळे वाहन डिव्हायडरवर चढून पलटी झाले.या अपघातात साक्ष भाटिया (वय 29) यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्या ओठाला मार लागून जखम झाली आहे तसेच डोळ्याला सूज आली आहे. तर आकाशदीप मिंझ (वय 31) यांना किरकोळ दुखापत झाली आहे.
राज्यातील 364 पोलिसांना मिळणार बढती; सहाय्यक पोलिस निरीक्षक आता होणार पोलिस निरीक्षक
‘रेस ट्रॅक’ची भीती ठरली खरी
विशेष म्हणजे, ‘नवराष्ट्र’च्या रायगड आवृत्तीमध्ये याच एअरपोर्ट लिंक रोडबाबत धोक्याचा इशारा देण्यात आला होता.“करंजाडे-उलवे अॅक्सेस रोड बनतोय रेस ट्रॅक; अपघातांची भीती तीव्र” या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या वृत्तात वाहनचालकांचा बेफाम वेग, अपुऱ्या सुरक्षा उपाययोजना, वळणावरील धोका आणि रस्त्यावर पडलेले बांधकाम साहित्य यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.आता घडलेल्या या अपघातामुळे त्या इशाऱ्याची प्रचिती आली असून प्रशासनाच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
“मोठा अपघात झाल्यावरच प्रशासन जागे होणार का?”
सीसीटीव्ही कॅमेरे, स्पीड ब्रेकर, वेगमर्यादा फलक आणि पोलिस पेट्रोलिंग वाढवण्याची मागणी आता जोर धरत आहे.