
फोटो सौजन्य- गुगल
यंदाच्या गणेशोत्सवाला अवघा महिनाभराचा कालावधी शिल्लक असताना नवी मुंबईतील गणेशमूर्ती बाजारपेठेत लगबग सुरू झाली आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश अधिक प्रभावीपणे रुजत असतानाच शाडूच्या गणेशमूर्तीच्या किमतीत १२ ते १५ टक्क्यांनी वाढ झाल्याने भाविकांसह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या खर्चातही वाढ होणार आहे.
दुसरीकडे पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने मुंबई, ठाणे, रायगड आणि नवी मुंबई परिसरातील अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यंदा २८ फुटांपेक्षा उंच मूर्ती न बसविण्याचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवासाठी मूर्तिकारांकडून अंतिम टप्प्यातील रंगरंगोटी आणि सजावटीची कामे वेगाने सुरू आहेत. शाडूच्या मातीपासून तयार होणाऱ्या मूर्तीना यंदाही मोठी मागणी असून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा विचार करून अनेक भाविक प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) ऐवजी शाडूच्या मूर्तीना पसंती देत आहेत. मात्र शाडूची माती, रंग, सजावटीचे साहित्य, वाहतूक खर्च तसेच मजुरीत झालेली वाढ यामुळे मूर्तीच्या किमती वाढल्याचे मूर्तिकार सांगत आहेत. वाशी, तुर्भे, नेरुळ, बेलापूर, ऐरोली, कोपरखैरणे, घणसोलीत लहान-मोठ्या मूर्ती कार्यशाळा कार्यरत आहेत. दरवर्षी लाखो रुपयांची उलाढाल होत असून हजारो कारागिरांना रोजगार उपलब्ध होतो.
घणसोली गावातील मूर्तिकार रोहिदास महादू पाटील यांच्या श्री गणेश कला निकेतन कार्यशाळे दरवर्षी सुमारे १५०० ते २००० गणेशमूर्ती साकारल्या जातात. त्यापैकी १५० ते २०० मूर्ती शाडूच् असतात. यंदा घणसोलीतील एका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने २७ फूट उंचीच्या गणेशमूर्ती ऑर्डर दिली असून ही परिसरातील प्रमुख आकर्षणांपैकी एक ठरणार आहे.
नद्या, तलाव आणि समुद्रातील प्रदूषण कमी करण्यासाठी शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था सातत्याने शाडूच्या गणेशमूर्तीचा वापर करण्याचे आवाहन करत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत जागरूकता वाढत असल्याचे चित्र आहे. अनेक मंडळांनीही यंदा आकर्षक सजावटीसोबत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या संकल्पनांना प्राधान्य दिले आहे. गणेश मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष संतोष चोलकर यांनी सांगितले की, मुंबई, पनवेल आणि ठाणे महापालिकांकडू मूर्तिकारांना शाडूची माती उपलब्ध करून देणे, वीज पाणीपुरवठा, तात्पुरते शेड आणि अन्य मूलभूत सुविध पुरवल्या जातात. मात्र नवी मुंबई महापालिकेकडून अश सुविधा अद्यापही उपलब्ध होत नसल्याची खंत व्यक्त केली.
यंदा अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आकर्षक सजावटीसोबत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या संकल्पनांना प्राधान्य दिले आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Ans: शाडूची माती, रंग, सजावटीचे साहित्य, वाहतूक आणि मजुरीचा खर्च वाढल्यामुळे मूर्तींच्या किमतीत १२ ते १५ टक्क्यांची वाढ झाली आहे.
Ans: शाडूच्या मातीच्या मूर्ती पाण्यात सहज विरघळतात आणि पीओपीच्या मूर्तींच्या तुलनेत जलप्रदूषण कमी करतात.
Ans: शाडूच्या गणेशमूर्तींची निवड करावी, नैसर्गिक सजावटीचा वापर करावा आणि शक्य असल्यास कृत्रिम किंवा घरगुती विसर्जनाचा पर्याय स्वीकारावा.