Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jayant Patil : ‘माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही’ ; जयंत पाटलांच्या वक्तव्याने खळबळ

जयंत पाटील यांनी स्वत: थेट व्यासपीठावरच 'माझी गॅरेंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही' असं वक्तव्य केल्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Mar 12, 2025 | 03:54 PM
'माझी गॅरेंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही' ; जयंत पाटलांच्या वक्तव्याने खळबळ

'माझी गॅरेंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही' ; जयंत पाटलांच्या वक्तव्याने खळबळ

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या पक्षांतराच्या चर्चा सुरू आहेत. ते भाजपमध्ये जाणार असल्याचं बोललं जात आहे. त्यातच आज जयंत पाटील यांनी स्वत: थेट व्यासपीठावरच ‘माझी गॅरेंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही’ असं वक्तव्य केल्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे. राजू शेट्टींच्या नेतृत्त्वात शक्तीपीठ महामार्गाविरोधात आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनातून ते बोलत होते.

महायुतीत पुन्हा वादाची ठिणगी पडणार? ‘या’ मुद्यावरून शिंदे-पवार गटात अस्वस्थता

नक्की काय म्हणाले जयंत पाटील?

राजू शेट्टी यांनी जो झेंडा हाती घेतला तो कधी सोडलेला नाही. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. मात्र ‘माझी गॅरेंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही’. कारण काय तर तुम्हाला माझ्याबद्दल शंका असते. त्यामुळे तुम्हाला हमी देणं हे जरा धोक्याचं आहे. राजू शेट्टी आज खासदार राहिले असते तर लोकसभेत भाषण केलं असतं. ते झालेही असते खासदार, पण ते माझा सल्लाच ऐकत नाहीत, ही खरी समस्या आहे, असं ते मिश्किलपणे म्हणाले.

काही दिवसांपर्वी जयंत पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मध्यरात्री भेट घेतली होती. या भेटीत दोघांमध्ये एक तास चर्चा झाल्याची माहिती मिळाली होती. बावनकुळेंच्या मुंबईतील बंगल्यावर ही भेट घेतली असून यावेळी भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हदेखील उपस्थित होते. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठं काहीतरी घडणार अशा चर्चांना उधाण आलं आहे. यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांसमोर नंतर खुलासा केला होता.

Krushna Andhale Update: संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये..; पोलीस अलर्टवर

जयंत पाटील सांगली जिल्हा आणि त्यांच्या जिल्ह्यातील महसुली खात्याशी संबंधित काही विषय घेऊन भेट घेण्यासाठी आले होते. विखे पाटील सोबत होते. 14 ते 15 विषय महसूल विभागाशी संबंधित असल्याने भेट झाली. सांगली जिल्ह्याच्या विकास कामाबद्दल त्यांनी चर्चा केली. येणाऱ्या अधिवेशनात या 14 समस्या माझ्या दालनात बैठक लावून सोडवणार आहे, फक्त विकास कामांची चर्चा झाली. जयंत पाटील यांनी काल कुठलीही राजकीय चर्चा केली नाही आणि मी जयंत पाटील यांच्या राजकीय भवितव्याबद्दल बोलावं एवढा मोठा नाही, असं बावनकुळे यांनी म्हटलं होतं.

दरम्यान आज जयंत पाटील यांनी माझं काही खरं नाही म्हटल्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यांचं हे विधान राजू शेट्टीसंदर्भात बोलताना असलं तरी त्याचा संबंध पक्षप्रवेशाशी जोडला जात आहे.

Web Title: Ncp sharad pawar group state chief jayant patil reaction over bjp joining number in shaktipeeth highway protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2025 | 03:20 PM

Topics:  

  • jayant patil
  • Maharashtra Politics
  • Shaktipeeth Highway

संबंधित बातम्या

Raigad News : “…हाच आमचा श्वास”; मतदारसंघात शाश्वत विकास करण्याबाबत सुनील तटकरेंचे मोठे विधान
1

Raigad News : “…हाच आमचा श्वास”; मतदारसंघात शाश्वत विकास करण्याबाबत सुनील तटकरेंचे मोठे विधान

Maharashtra Politics: राजकारण फिरले! ‘या’ बड्या नेत्याने सोडली शरद पवारांची साथ, निवडणुकीआधी खळबळ
2

Maharashtra Politics: राजकारण फिरले! ‘या’ बड्या नेत्याने सोडली शरद पवारांची साथ, निवडणुकीआधी खळबळ

Mumbai Crime News: दहिसरमध्ये शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून दोन जणांना बेदम मारहाण; व्हिडीओ व्हायरल
3

Mumbai Crime News: दहिसरमध्ये शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून दोन जणांना बेदम मारहाण; व्हिडीओ व्हायरल

Maharashtra Politics: “आज पाणी पित असलो तरी…”; पुण्यनगरीतून धडाडली CM फडणवीसांची तोफ
4

Maharashtra Politics: “आज पाणी पित असलो तरी…”; पुण्यनगरीतून धडाडली CM फडणवीसांची तोफ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.