उध्दव ठाकरेंच्या काळात गुंडाराज,वसुली सरकार कसं होतं हे जनतेने पाहिलं आहे, नितेश राणे यांचा हल्लाबोल
कणकवली ( भगवान लोके ): विधानसभेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातील आरोप प्रत्यारोपांची फैरी सुरुच आहे. याचपार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर तीव्र शद्धांत शाब्दिक वार केले आहेत. कणकवली येथे पत्रकार परिषदेत बोलताना नितेश राणे म्हणाले की, गेल्या अडीच वर्षात उद्धव ठाकरे सत्तेत असताना राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं. गुंडाराज, वसुली सरकार कसे असते हे उध्दव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री काळात पाहिले. मोक्का लागलेले आरोपी घेवून संजय राऊतांसारखे लोक पत्रकार परिषदेत बसायचे.
उध्दव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मन्सुक हिरेन, दिशा सालियन अशा हत्या झाल्या. सचिन वाझे सारखे अधिकारी वसुली गँग चालवायचे. आता आमचे महायुती सरकार मध्ये तीन सिंघम राज्याच्या मंत्रिमंडळात आहेत. म्हणूनच दोन आरोपी पकडले गेलेत.ठाकरे मुख्यमंत्री असताना मन्सूक हिंरेनचे आरोपी का पकडले गेले नाहीत ? दिशा सालियान चे आरोपी जेल मध्ये का गेले नाहीत, असा सवाल भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी केला.
हेही वाचा- राज्यातील दोन मोठ्या नदीजोड प्रकल्पांना मंजुरी, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेतले 19 महत्त्वाचे निर्णय
नितेश राणे म्हणाले की , ठाकरे सरकारमध्ये संजय राऊत सारख्या शक्ती कपूरकडून महिला सुरक्षित नव्हत्या आणि आता आम्हाला लेक्चर देत आहेत.तुमच्या मालकाच्या घरात गुंडाच्या टोळ्या आहेत. काही टिळक नगरमधील टोळ्या आणि काही दाऊद गँगचे पण आहेत. त्यांची नाव आम्ही द्यायची का ? असा सवाल राणेंनी केला.पुढे नितेश राणे असंही म्हणाले की, सर्वात मोठा गुंडांचा लीडर मोतोश्रीच्या तिसऱ्या मजल्यावर बसलेला आहे.आम्हाला तोंड उघडायला लावू नका. नाहीतर तुमचं वस्त्रहरण करु असा इशारा दिला.असंख्य गुन्हे आहेत ,ज्यात गोळ्या घालणे गरजेचे होते. पाटकर प्रकरणात गोळ्या घालायच्या का? गुजरातचे खरे ब्रँड ॲम्बॅसेडर उद्धव ठाकरे आहेत.त्यामुळे संजय राऊत यांनी इतरांना बोलण्यापूर्वी तुमचा मालक आणि त्यांचा मुलगा गुजराती कार्यक्रमाला नाच्या सारखे नाचत असतात ते पाहा.स्वतः पनवती असलेल्या लोकांनी इतरांवर टीका करू नये. कितीही बोंबलात तरी देवा भाऊ काय आहे. हे जनतेला माहित आहे.माता बहिणींनी देवा भाऊवर विश्वास ठेवला आहे असं आ. नितेश राणे यांनी सांगितले.