Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तीन अपत्ये असलेल्या पोलिसाच्या कोणत्याच वारसाला अनुकंपा नोकरी नाही; उच्च न्यायालयात सरकारचे प्रतिज्ञापत्र

तीन मुले असलेल्या पोलिसाच्या कोणत्याच वारसाला अनुकंपा नोकरी देता येत नाही, असे स्पष्टीकरण सरकारच्या वतीने हायकोर्टात देण्यात आले आहे. तसेच याबाबतच्या अध्यादेशाची प्रती व प्रतिज्ञापत्र सामान्य प्रशासन विभागाकडून दाखल करण्यात आले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 31, 2024 | 11:28 AM
तीन अपत्ये असलेल्या पोलिसाच्या कोणत्याच वारसाला अनुकंपा नोकरी नाही; उच्च न्यायालयात सरकारचे प्रतिज्ञापत्र
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : तीन मुले असलेल्या पोलिसाच्या कोणत्याच वारसाला अनुकंपा नोकरी देता येत नाही, असे स्पष्टीकरण सरकारच्या वतीने हायकोर्टात देण्यात आले आहे. तसेच याबाबतच्या अध्यादेशाची प्रती व प्रतिज्ञापत्र सामान्य प्रशासन विभागाकडून दाखल करण्यात आले. 31 डिसेंबर 2001 नंतर ज्या पोलिसाला तिसरे अपत्य झाले आहे, त्याला हा नियम लागू होतो, असेही प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

न्या. ए. एस. चांदुरकर व न्या. जितेंद्र जैन यांच्या खंडपीठासमोर एका पोलिस कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी पार पडली. तर सामान्य प्रशासन विभागाचा हा अध्यादेश प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. त्यामुळे तो लागूच होत नाही, असा दावा याचिकाकर्त्यांचे वकील दिनेश अडसुळे यांनी केला. आम्ही याबाबत सविस्तर सुनावणी घेऊ, असे न्यायालयाने स्पष्ट केले. यावरील पुढील सुनावणी दोन आठवड्यांनी होणार आहे.

अनुकंपा नोकरी कोणाला देता येईल याचे निकष सांगणारा अध्यादेश 28 मार्च 2001 रोजी सामान्य प्रशासन विभागाने काढला. तीन अपत्य असलेल्या पोलिसाचा कोणताच वारस अनुकंपा नोकरीसाठी पात्र नाही, असे या अध्यादेशात स्पष्ट करण्यात आले आहे. हा अध्यादेश सर्व पोलिसांना ज्ञात आहे, असा दावा प्रतिज्ञापत्रात करण्यात आला आहे. तर याचिकाकर्त्यांच्या वकीलांनी यावर आक्षेप घेत अध्यादेश सरकारकडून प्रसिध्द करण्यात आला नाही. त्यामुळे लागू होत नसल्याचे कोर्टाला सांगितले.

प्रकरणाचा सारांश; अध्यादेश प्रसिद्धच नाही

पोलीस नाईक सुनील अहिरे यांचे 18 फेब्रुवारी 2013 रोजी निधन झाले. त्यांच्या जागेवर अनुकंपा नोकरी मिळावी यासाठी विद्या सुनील अहिरे व मनीष सुनील अहिरे यांनी अॅड. दिनेश अडसुळे यांच्या मार्फत ही याचिका केली आहे. 1994, 1996 व 2001 च्या सामान्य प्रशासन विभागाच्या अध्यादेशानुसार पोलिसाच्या वारसाला अनुकंपा नोकरी देता येते. मनीषला अनुकंपा नोकरी द्यावी, असा अर्ज प्रशासनाकडे करण्यात आला. पोलिस खात्याने अनुकंपा नोकरी नाकारली. तसेच मॅटने अनुकंपाचा दावा नाकारला. त्यामुळे त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली.

Web Title: No heir of a cop with three children has a compassionate job nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2024 | 11:28 AM

Topics:  

  • Home Minister
  • maharashtra
  • Mumbai

संबंधित बातम्या

Mumbai–Ahmedabad Bullet Train Project : ‘बीकेसी ते शिळफाटा’ बोगदा अंतिम टप्प्यात, एनएचएसआरसीएलकडून मोठी अपडेट समोर
1

Mumbai–Ahmedabad Bullet Train Project : ‘बीकेसी ते शिळफाटा’ बोगदा अंतिम टप्प्यात, एनएचएसआरसीएलकडून मोठी अपडेट समोर

Mumbai News: मुंबईतील शेकडो कुटुंबांसाठी दिलासादायक! प्रलंबित LIC इमारतीच्या पुनर्विकासाचा मार्ग होणार मोकळा
2

Mumbai News: मुंबईतील शेकडो कुटुंबांसाठी दिलासादायक! प्रलंबित LIC इमारतीच्या पुनर्विकासाचा मार्ग होणार मोकळा

Mumbai Crime: किरकोळ वाद अन् ॲसिडचा घात…! कामगारांनी एकमेकांवर फेकलं ॲसिड, बेकायदेशीर कंपनीला वेढा
3

Mumbai Crime: किरकोळ वाद अन् ॲसिडचा घात…! कामगारांनी एकमेकांवर फेकलं ॲसिड, बेकायदेशीर कंपनीला वेढा

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३५ वी जयंती ‘विचारांचा उत्सव’ म्हणून साजरी होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासनाला निर्देश
4

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३५ वी जयंती ‘विचारांचा उत्सव’ म्हणून साजरी होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासनाला निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.