Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लाखो मताधिक्याने कोणीही निवडून येणार नाही, मनसे आमदार राजू पाटील यांचा खासदार श्रीकांत शिंदे यांना सल्ला

नावे बदलण्याऐवजी प्रवाशांच्या सोयी सुविधाकरीता काम करा. मनसे आमदार राजू पाटील यांचा खासदार राहूल शेवाळे यांना सल्ला

  • By शुभांगी मेरे
Updated On: Mar 13, 2024 | 02:19 PM
लाखो मताधिक्याने कोणीही निवडून येणार नाही, मनसे आमदार राजू पाटील यांचा खासदार श्रीकांत शिंदे यांना सल्ला
Follow Us
Close
Follow Us:

कल्याण-अमजद खान : कल्याण लाेकसभा ही काठावर पास होण्यासारखी स्थिती आहे. अँटी इन्कम्बन्सी आहे. लाखो मताधिकाऱ्याने काेणी निवडणूक जिंकणार असे चित्र नाही. महायुतीत धूसफूस सुरु आहे. त्यात ही राष्ट्रवादी आली आहे. ज्यांना निवडून यायचे आहे. त्यांनी सावरुन घ्यावे असा सल्ला मनसे आमदार राजू पाटील यांनी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांना त्यांचा नमोल्लेख न करता दिला आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघातील विविध विकास कामांच्या भूमीपूजना दरम्यान मनसे आमदार राजू पाटील यांनी यांनी हे विधान केले आहे.

स्टेशनचे नाव बदलण्याऐवजी त्या रेल्वे स्थानकाची रुप रेषा बदलली पाहिजे. लोकल प्रवाशांना काय समस्या आहेत. हे खासदारांनी पाहून घेतले पाहिजे अशी सूचना देखील राजू पाटील यांनी खासदार राहूल शेवाळे यांनी केली. शेवाळे यांनी आठ रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मागणीवर आमदार पाटील यांनी उपरोधिक सल्ला दिला आहे.

बैलगाडा शर्यती करणाऱ्यांना एक आवाहन करावेसे वाटते. एक चांगल्या प्रकारे बैलगाडा शर्यती सुरु व्हाव्यात यासाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले. राज्यात बैलगाडा शर्यतीवर बंदी होती. इतक्या प्रयत्नांती बैलगाडा शर्यती सुरु झाल्या. बळीराजा असलेल्या शेतकऱ्यांकरीता एक विरंगळा बैलगाडा शर्यती सुरु केलेल्या आहेत. त्याला असे स्वरुप येऊ नये. बैलगाडा शर्यतीमुळे मारामाऱ्या हाेत असतील, मुडदे पडत असतील तर त्या न झालेल्या बऱ्या. अशा गोष्टी टाळण्याकरीता बैलगाडा समितीेन कठेार पाऊल उचलले पाहिजे. अन्यथा याचे परिणाम भयंकर होणार आहेत अशी शक्यता मनसे आमदार राजू पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

दोन दिवसात 40 विकास कामांचे भूमीपूजन

गेल्या दोन दिवसांपासून कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघात भूमीपूजनाचे कार्यक्रम सुरु आहेत. त्यामध्ये ठाणे जिल्हा परिषद, नवी मुंबई महापालिका, ठाणे महापालिका आणि कल्याण डोंबिवली महापालिका अशा चार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विविध लेखाशीर्षाखाली विकास कामे मंजूर करण्यात आली आहे. जवळपास 26 कोटी 50 लाख रुपये खर्चाची कामे मंजूर झाली आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी या कामांचे भूमीपूजन सुरु केले आहे. आत्तापर्यंत 40 पेक्षा जास्त विकास कामांचे भूमीपूजन झाले असल्याची माहिती मनसे आमदार राजू पाटील यांनी दिली आहे.

Web Title: No one will get elected with lakhs of votes mns mla raju patil advises mp shrikant shinde maharashtra political party maharashtra government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2024 | 02:19 PM

Topics:  

  • Cm Eknath Shinde
  • kalyan
  • maharashtra
  • Maharashtra Government
  • MNS MLA Raju Patil
  • MP Shrikant Shinde
  • thane

संबंधित बातम्या

Ajit Pawar : वसईकर, कुठे जाऊन बसता तुम्ही? अजित पवारांनी अधिकाऱ्यांना झापलं
1

Ajit Pawar : वसईकर, कुठे जाऊन बसता तुम्ही? अजित पवारांनी अधिकाऱ्यांना झापलं

पुण्यातील नाट्यगृहांचे नूतनीकरण ‘या’ महिन्यापर्यंत होणार; वारंवार येणाऱ्या समस्यांना मिळणार पूर्णविराम
2

पुण्यातील नाट्यगृहांचे नूतनीकरण ‘या’ महिन्यापर्यंत होणार; वारंवार येणाऱ्या समस्यांना मिळणार पूर्णविराम

Devendra Fadnavis: “कृत्रिम बुद्धिमत्ता हे तंत्रज्ञान प्रत्येक…”; मुख्यमंत्री फडणवीसांचे प्रतिपादन
3

Devendra Fadnavis: “कृत्रिम बुद्धिमत्ता हे तंत्रज्ञान प्रत्येक…”; मुख्यमंत्री फडणवीसांचे प्रतिपादन

Maharashtra Government: “आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी मदत पॅकेज आणि…”; मदत व पुनर्वसन मंत्री काय म्हणाले?
4

Maharashtra Government: “आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी मदत पॅकेज आणि…”; मदत व पुनर्वसन मंत्री काय म्हणाले?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.