Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तब्बल ४६२ गर्भवतींचा मृत्यू…! पालघरमध्ये गर्भवतींच्या मृत्यूत वाढ; आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह

एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पालघरमध्ये गेल्या काही वर्षात गर्भवती महिलांच्या मृत्यूमध्ये वाढ होत आहे. यामुळे आरोग्य व्यवस्था आणि सुरक्षेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 20, 2025 | 04:42 PM
Rise in Maternal Deaths in Palghar

Rise in Maternal Deaths in Palghar

Follow Us
Close
Follow Us:
  • तब्बल ४६२ गर्भवतींचा मृत्यू
  • पालघरमध्ये गर्भवतींच्या मृत्यूत वाढ
  • आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह
संजू पवार :  पालघर, पालघर जिल्ह्यात गर्भवती महिलांच्या मृत्यूचे प्रमाण गंभीर चिंता निर्माण करणारे आहे. २०११ पासून आजपर्यंत, जिल्ह्यातील विविध सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या ४६२ गर्भवती महिलांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये अज्ञात कारणांनी, अव्यवस्थित उपचार पद्धती आणि चिकित्सा सुविधा कमी असणे यांचा महत्त्वाचा वाटा आहे. आधिकारिक आकडेवारीनुसार, या मृत्यूंमागील प्रमुख कारणांमध्ये रक्तदाब वाढणे, गर्भाशयातील इन्फेक्शन, रक्तसंचयाची कमी, आणि योग्य वेळेत आपत्कालीन उपचार न मिळवणे यांचा समावेश आहे. किमान १०० हून अधिक मृत्यू गर्भवती महिलांसाठी वेळेवर उपचार उपलब्ध झाले नसल्याने झाल्याची बाब अधोरेखित झाले.

Amravati News: १ जानेवारीपासून ‘या’ जिल्ह्यात ‘बालविवाहमुक्त’, बालविवाह झाल्यास होणार कारवाई

सेवा सुधारणा, निधी व व्यवस्थापनाची गरज

ग्रामीण भागातील रुग्णालयांमध्ये योग्य वैद्यकीय साधन सामग्रीची आणि तज्ज्ञ डॉक्टर्सची कमतरता आहे, गर्भवती महिलांसाठी आपत्कालीन सुविधा असलेल्या केंद्रांचा अभाव तसेच मुलीच्या जन्माला येणाऱ्या मृत्यूचे प्रमाण देखील चिंताजनक आहे. यावर तातडीने उपाययोजना करणे अत्यावश्यक बनले आहे. आरोग्य विभागाने या गंभीर समस्येचे गांभीर्य ओळखून पुढील काळात जिल्हह्यात अधिक तत्परतेने उपचार सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे.

शासकीय रक्तपेढी उभारणीमुळे दिलासा

तथापि, आरोग्य सेवांचा सुधारण्ड करण्यासाठी सरकारी निधी व व्यवस्थापनाची मदत महत्त्वाची ठरणार आहे. यात लक्ष वेधून घेणारी बाब महणजे, खाजगी रुग्णालये व वैद्यकीय केंद्रे मध्ये उपचारांसाठी डॉक्टर उपलब्ध होत नसल्याने झाल्याचे समोर आले आहे. आता ग्रामीण रुग्णालयांनी जिल्ह्यात २७स्त्रीरोग तज्ज्ञाची नेमणूक करून पालघर आणि जव्हार या ठिकाणी शासकीय रक्तपेढीची उभारणी केली आहे. शिवाय डहाणू आणि कासा, वाडा येथे ब्लड स्टोरेज व्यवस्था उभी केली आहे. अति जोखमीच्या अल्पवयीन मातांची सोनोग्राफी करून प्रसूतसाठी शस्त्रक्रिया केंद्र जव्हार, कासा, डहाणू, पालघर, मनौर, वाहा येथे उभारणी कैले आहे. यामुळे गर्भवती महिलांचं मृत्यूचे प्रमाण घटले आहे.

गर्भवती महिलांचा मृत्यु

मिळालेल्या आकडेवारीनुसार, २०११  मध्ये पालघरमध्ये १५ गरदोर महिलांचा मृत्यू झाला होता, तर २०२२ मध्ये ५५ गरदोर महिला आणि २०२३ मध्ये ६५ गरदोर महिलांचा मृत्यू झाला होता. ही संख्या वाढत चालल्याने चिंता निर्माण झाली आहे.

पालघरचे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रामदास मराड यांनी म्हटले की, २०११ ते २०२१ च्या कालावधीत स्त्री रोग तज्ज्ञ आणि शासकीय रक्तपेढी उपलब्धबाबत समस्या होती. आता शासनाने मृत्यू प्रमाण घटवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु केले आहेत. आवश्यक प्रमाणात तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता केली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात आता हेल्दी रिलेशन म्हणणं सुद्धा जड जातं; विनोद तावडे यांचं मत

Web Title: Rise in maternal deaths in palghar raises questions over healthcare system 462 pregnant women die

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 20, 2025 | 04:42 PM

Topics:  

  • maharashtra news
  • navarashtra news
  • Palghar news

संबंधित बातम्या

वसई किल्ल्यावर चित्रीकरणाच्या नावाखाली हुल्लडबाजी; पुरातन वास्तूंचे नुकसान झाल्याने इतिहासप्रेमी नाराज
1

वसई किल्ल्यावर चित्रीकरणाच्या नावाखाली हुल्लडबाजी; पुरातन वास्तूंचे नुकसान झाल्याने इतिहासप्रेमी नाराज

महाराष्ट्रामध्ये निवडणुकीमुळे हालचालींना वेग; कोणत्या बाजूने पडेल राजकीय कौल
2

महाराष्ट्रामध्ये निवडणुकीमुळे हालचालींना वेग; कोणत्या बाजूने पडेल राजकीय कौल

पाटण तालुक्यातील नाडोलीत चार घरांना भीषण आग; अनेक वस्तू जळून खाक
3

पाटण तालुक्यातील नाडोलीत चार घरांना भीषण आग; अनेक वस्तू जळून खाक

चिंचणी ग्रामपंचायतीत दप्तर घोटाळा उघड; ग्रामसभेत कबुली, तीन महिन्यांपासून महत्त्वाची कागदपत्रे गायब असल्याचे स्पष्ट
4

चिंचणी ग्रामपंचायतीत दप्तर घोटाळा उघड; ग्रामसभेत कबुली, तीन महिन्यांपासून महत्त्वाची कागदपत्रे गायब असल्याचे स्पष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.