कीटकनाशकाची फवारणी बेततेय जीवावर! फवारणीतून ५१ जणांना विषबाधा, कीटकनाशके वापरतांना काळजी घ्या
चुकीच्या पध्दतीने फवारणी करणे यासह तंबाखू, गुटखा याचे सेवन यामुळे मध्यंतरीच्या काळात अनेकांना विषबाधा झाली होती. २०१७मध्ये तर हा मुद्दा देशपातळीवर गाजला होता. तुर्तास जिल्ह्यात शेतात कीटकनाशक फवारणी करताना ५१ जणांना विषबाधा झाली. दरम्यान विषबाधा झालेल्या एकाही व्यक्तीची नोंद नसल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, शेतामध्ये कीटकनाशकांची फवारणी करताना आवश्यक ती खबरदारी न घेतल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी कीटकनाशकांचा वापर करताना विशेष दक्षता घेण्याची गरज आहे.(फोटो सौजन्य – AI)
ढगाळी वातावरणामुळे सध्या सोयाबीन कपाशी पिकांवर मावा, तुडतुडे पांढरी माशी यासह विविध रोगाचा प्रादुर्भाव आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना किडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी किटकनाशकाची फवारणी करणे सुरू आहे. मात्र फवारणी करतांना अनेक शेतकरी, शेतमजुर सुरक्षीत साहित्याचा वापर करतांना दिसत नाही. अनेकदा तर दुषीत हातानेच तंबाखू, खर्रा व तत्सम पदार्थ चळघळतात. घातक किटकनाशकाची फवारणी करताना सुरक्षा किट, हातमोजे, नाकाला मास्क लावणे आवश्यक असते. मात्र शेतकरी, शेतमजूर अशा साधनांकडे सर्रास दुर्लक्ष करतो. त्यामुळे यातून अनेकांना विषबाधा होते. जिल्ह्यात २०२६ मध्ये विषबाधेची एकूण ५१ प्रकरणे नोंदविण्यात आली असून, यापैकी कीटकनाशक फवारणीच्या संपर्कामुळे एकही व्यक्ती बाधित अथवा मृत झालेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान कृषी व पोलिस विभागाच्या शासन परिपत्रकानुसार तसेच कीटकनाशक अधिनियम, १९६८ मधील कलम २६ अंतर्गत जिल्ह्यातील विषबाधा आणि मृत्यूच्या घटनांची माहिती संकलित करण्यात आली आहे. हा अहवाल कृषी विभागाच्या मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे. जिल्ह्यात फवारणीच्या संपर्कामुळे कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही. यावर्षी ऑगस्टपर्यंत ५१ जणांचा किटकनाशक फवारणी दरम्यान विषबाधा झाली होती.
जिल्ह्यात कीटकनाशक फवारणीदरम्यान शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा होण्याची समस्या नवीन नाही. यवतमाळ जिल्ह्यात २०१७ मध्ये सर्वप्रथम मोठ्या प्रमाणावर विषबाधेच्या घटना समोर आल्या होत्या. या घटनेत ४५० च्या वर शेतकरी व शेतमजूरांना फवारणी करतांना बाधा होवून यात तब्बल २३ जणांचा मृत्यू झाला होता. ही बाब प्रचार माध्यमांनी लावून धरल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री, कृषिमंत्री आणि पालकमंत्री यांनी बाधितांची भेट घेऊन परिस्थितीची पाहणी केली होती. प्रशासनाला तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देशही देण्यात आले होते.
आदिवासींचे मुख्यमंत्र्यांना निवेदन! समाजाच्या विविध मागण्या; आदिवासी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित
२०२० मध्ये पुन्हा २२ शेतकरी व शेतमजुरांना फवारणी दरम्यान विषबाधा झाली होती. मात्र यावेळी कोणतीही जिवीतहाणी झाली नाही. त्यानंतर २०२५ मध्ये पांढरकवडा तालुक्यात एकाला विषबाधा झाली होती. दरम्यान या घटनानंतर कृषी विभाग जागा झाला. त्यांनी विविध माध्यमांतून शेतकरी, शेतमजुरासाठी फवारणीसंदर्भात विविध मेळावे, शिबीर आयोजित करण्यात आले. यासह फवारणींचे संरक्षण किट सुध्दा उपलब्ध करून देण्यात आले होते.८८ जिल्ह्यात आतापर्यंत ५१ शेतकऱ्यांना फवारणी करताना विषबाधा झालेली आहे. या सर्व शेतकऱ्यांवर येथील रूग्णालयात उपचार करून त्यांना सुट्टी देण्यात आली. शेतकऱ्यांनी तसेच शेतमजुरांनी फवारणी करतांना काळजी घेणे आवश्यक आहे. जेणेकरून त्यांना अशा समस्येपासून स्वतःला वाचविता येईल.






