Photo Credit- Social Media नितेश राणेंना कांद्यांचा हार घालणाऱ्या पोलिसांनी शेतकऱ्याला घेतलं ताब्यात
नाशिक : सध्या देशभरात दिवसेंदिवस कांद्याच्या दरात मोठी घसरण होत कांदा उत्पादक शेतकरी अनेक अडचणींचा सामना करत आहेत.त्यामुळे अनेक शेतकरी संघटनाही आक्रमक झाल्या आहेत. अशातच काल (23 डिसेंबर) मंत्री नितेश राणे यांनी नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पादुका दर्शनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
निवृत्तीनाथ महाराजांच्या पादुका दर्शनाच्या कार्यक्रमात बोलत असताना एक वेगळच प्रकार घडला. नितेश राणे सभेला संबोधित करत असनाच अक शेतकरी मंचावर आला आणि त्याने नितेश राणेंना कांद्यांचा हार घातला. त्यावर नितेश राणेंनी त्या शेतकऱ्याला अडवू नका, त्याची समस्या ऐकून घेऊ, असे म्हटले. त्यानंतर शेतकऱ्याने माईकवर बोलण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्याला बोलू दिले आणि त्याला ताब्यात घेतले.
दरम्यान गेल्या आठवड्यात गुरुवारी (19 डिसेंबर) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारला कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क हटवण्याची विनंती केली होती. त्यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहून नाशिकच्या कांदा शेतकऱ्यांबाबत बोलले होते. पवार म्हणाले की, नवीन पीक आल्याने बाजारपेठेत कांद्याची आवक झाली आहे. शेतकऱ्यांना सरासरी २४०० रुपये प्रतिक्विंटल दराने आपला माल विकावा लागतो.
देशातील सर्वात मोठ्या घाऊक कांदा मार्केट लासलगाव नाशिक येथील कांद्याचे सरासरी दर महिन्याभरात 50 टक्क्यांनी घसरले आहेत. गेल्या महिन्यापर्यंत भाव 4 हजार रुपये प्रतिक्विंटल असताना रविवारी (22 डिसेंबर) ते 2 हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आले. नवीन खरीप पीक आल्याने कांद्याचे भाव गडगडले आहेत. महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या प्रमुख कांदा उत्पादक भागात नवीन कांद्याची आवक वाढल्याने दर आणखी घसरतील, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
मुलींचा घसरता जन्मदर चिंता वाढवणारा; केंद्रीय अहवालातून धक्कादायक वास्तव समाेर
ग्राहक व्यवहार विभागाच्या म्हणण्यानुसार, कांद्याच्या किरकोळ किमती 60 रुपये प्रति किलोवरून 40 रुपये किलोवर आल्या आहेत. खरीप पिकातील कांदा जास्त काळ ओलाव्यामुळे साठवता येत नसल्याचे कांदा व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शेतकरी ते खोदाईसह बाजारात आणतात. यावर्षी चांगला आणि वेळेवर झालेल्या पावसामुळे कांदा आणि टोमॅटो आणि बटाटा यांसारख्या इतर बागायती पिकांच्या उत्पादनात वाढ झाली आहे.
अधिकृत आकडेवारीनुसार, यावर्षी खरीप कांद्याचे क्षेत्र 0.36 दशलक्ष हेक्टर आहे, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत 27% अधिक आहे. खरीप कांद्याचा एकूण उत्पादनात 20% वाटा आहे. रब्बी कांदा, जो मार्चमध्ये काढला जातो आणि उत्पादनात सुमारे 60% योगदान देतो.
भारत हा जगातील सर्वात मोठा कांद्याची निर्यात करणारा देश आहे. 2022-23 मध्ये भारताने 2.5 दशलक्ष टन कांद्याची निर्यात केली होती. ज्यातून 4,525.91 कोटी रुपयांची कमाई झाली होती. मात्र, वाढत्या देशांतर्गत किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने अलीकडेच कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्यासारखे पाऊल उचलले आहे. याशिवाय महागाईला तोंड देण्यासाठी केंद्र सरकार कांद्याचा साठा मर्यादा वाढवणे, पुरवठा यांसारखी पावले उचलत आहे. तथापि, किमतीत स्थिरता आणण्यासाठी उत्पादन आणि पुरवठा साखळी सुधारणे देखील आवश्यक आहे.