Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सदाभाऊ खोत यांची शरद पवारांवर जहरी टीका; म्हणाले, “मराठ्यांना चुना लावायचे काम केलं”

लोकसभा निवडणुकीचा निकास लागला आहे. यानंतर सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर जहरी टिका केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jun 07, 2024 | 03:35 PM
सदाभाऊ खोत यांची शरद पवारांवर जहरी टीका; म्हणाले, “मराठ्यांना चुना लावायचे काम केलं”
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली. लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या महाविकास आघाडीने कडवी झुंज देत यश मिळवले. महायुतीला मोठा देत अनेक प्रतिष्ठित मतदारसंघाची लढाई जिंकली. यानंतर सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर निशाणा साधला असून मराठा आरक्षणावरुन घेरले आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये दूषित वातावरण निर्माण करण्याचं काम हे महाविकास आघाडीने केल्याची टीका सदाभाऊ खोत यांनी केली.

आरक्षणाचा वापर राजकीय पोळी भाजण्यासाठी

माध्यमांशी संवाद साधताना आपण महायुतीसोबत कायम असल्याचे सदाभाऊ खोत यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, “शरद पवार यांनी 60 वर्षे मराठ्यांना चुना लावण्याचं काम केलं. पण चुना लावणारा माणूस यावेळी यशस्वी झाला ही गोष्ट नाकारुन चालणार नाही. महाविकास आघाडीचे नेते शरद पवार आणि त्यांचा सगळा कंपू हे आता मनोज जरांगे पाटलांना कामाला कामाला लावणार आहेत. मनोज जरांगे यांचे आंदोलन आता विधानसभा निवडणुकीपर्यंत चालेल. आरक्षणाचा वापर राजकीय पोळी भाजण्यासाठी शरद पवार करत आहेत. शरद पवार यांनी मनोज जरांगे पाटलांना लिहून द्यावं की, त्यांचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आम्ही 10 टक्के ओबीसीमध्ये आरक्षण देऊ. जरांगे फॅक्टरचा सुद्धा महायुतीला तोटा झाल्याचे झाला. त्याचबरोबर कांदा प्रश्न दूध व सोयाबीनचा प्रश्न देखील महायुतीला महागात पडले,” असे मत सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले.

इंडिया आघाडी ही लुटारूंची टोळी

पुढे त्यांनी महायुतीच्या प्रयत्नांचे कौतुक केले. सदाभाऊ खोत म्हणाले, “महायुतीमधील आमच्या सगळ्या घटकपक्षांनी प्रमाणिकपणाने लोकसभेच्या निवडणुकीचं काम केलं. या महाराष्ट्राला विकासाच्या दृष्टीने घेऊन जाणारे नेतृत्व देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांच्या नेतृत्वाची गरज खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला आहे. देशाला विकासाच्या वाटेवरून घेऊन जाणारे नेतृत्व म्हणून आज संपूर्ण देश आणि जग नरेंद्र मोदी यांच्याकडे बघत आहे. इंडिया आघाडी ही खऱ्या अर्थाने लुटारूंची टोळी आहे. ही टोळीवाल्यांची आघाडी आहे. आमची लढाई भारत विरुद्ध इंडिया अशी आहे. भारतातली कष्ट करणारी जनता यांना घेऊन आम्ही लढत आहोत. या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं अनेक बागुलबुवा निर्माण केले गेले. त्याचाही परिणाम या निवडणुकीवर झाला,” असल्याचे सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.

Web Title: Poliitcal leader sadabhau khot criticism of ncp leader sharad pawar over loksbaha elections 2024 nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2024 | 03:35 PM

Topics:  

  • INDIA Alliance
  • loksabha elections 2024
  • Loksabha Elections Result 2024
  • Maratha Reservation
  • political news

संबंधित बातम्या

कोल्हापूरात राजकीय वातावरण रंगलं! कॉंग्रेसला झटका देत राहुल पाटलांचा महायुतीमध्ये प्रवेश निश्चित
1

कोल्हापूरात राजकीय वातावरण रंगलं! कॉंग्रेसला झटका देत राहुल पाटलांचा महायुतीमध्ये प्रवेश निश्चित

Voter List Fraud : महाराष्ट्राच्या मतदार याद्यांमध्ये भाजपकडून फेरफार, खुणा अन् बदल? जितेंद्र आव्हाड यांचे गंभीर आरोप
2

Voter List Fraud : महाराष्ट्राच्या मतदार याद्यांमध्ये भाजपकडून फेरफार, खुणा अन् बदल? जितेंद्र आव्हाड यांचे गंभीर आरोप

इंडिया आघाडीमध्ये उडाला मतभेदाचा भडका! उपराष्ट्रपती पदाच्या निर्णयावर ममता दीदी नाराज
3

इंडिया आघाडीमध्ये उडाला मतभेदाचा भडका! उपराष्ट्रपती पदाच्या निर्णयावर ममता दीदी नाराज

B. Sudarshan Reddy : उपराष्ट्रपतीपदाच्या रिंगणात उतरली इंडिया आघाडी; बी. सुदर्शन रेड्डी यांची उमेदवारी जाहीर
4

B. Sudarshan Reddy : उपराष्ट्रपतीपदाच्या रिंगणात उतरली इंडिया आघाडी; बी. सुदर्शन रेड्डी यांची उमेदवारी जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.